धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
Read More
नाशिक मधील वसंत नाईक यांच्या शिक्षण संस्थेची हक्काची जमीन हि वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली असून त्याचा खटला न्यायालयात सुरु आहे. या प्रमाणेच नाशिकमधील अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. आणि त्या जागांवर मोठंमोठे दर्गे, मशीदी उभारल्या जात आहेत हा समस्त हिंदुसाठी चिंतेचा विषय असून सर्व हिंदूंनी एकत्र येवून वक्फ बोर्डा विरोधात आवाज उठवत वक्फ बोर्ड रद्द केले पाहिजे. असे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'च्या समारोप कार्यक्रमात केले.
परिस्थितीचा अजिबात बाऊ न करता, नातेवाईकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. वेळप्रसंगी शेतात मोलमजुरी करून स्पर्धा परीक्षेतही बाजी मारली. तेव्हा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिवारापासून ते शिक्षणापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणार्या प्रशांत जाधव यांची ही यशोगाथा...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रथम महिला खासदार आणि स्वातंत्र्यानंतर नाशिक जिल्ह्यात पहिल्या केंद्रीय मंत्रिपदाचा बहुमान मिळालेल्या, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार. कोरोना काळातील आव्हाने आणि लसीकरण, आदिवासींचे आरोग्य, नाशिक जिल्ह्याचा विकास यांसारख्या विविध मुद्द्यांवर डॉ. भारती पवार यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
प्रशासनाला लागलेली भ्रष्ट्राचाराची कीड संपायचे नाव घेत नाहीये. लाचखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र, लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. २०२३ साली महाराष्ट्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ८०३ गुन्हे नोंदवत १ हजार, १७० आरोपींना ताब्यात घेतले आहे.
निर्धार पक्का केला, तर मराठी माणूसही व्यवसायामध्ये उत्तुंग यश, नावलौकिक मिळवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भवरी कलेक्शनचे सर्वेसर्वा रमेश लक्ष्मण भिलोरे. लहानपणापासून कष्टाची कामे केली. मात्र, सगळीकडून मदतीचे मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी जमीन विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच निर्णयातून आज ५० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. जाणून घेऊया त्यांची खडतर, परंतु तितकीच प्रेरणादायी अशी यशोगाथा......
देशात ज्या-ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ती-ती ठिकाणे दर १२ वर्षांनी विकसित होत असतात. परंतु, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते तीर्थस्थळ असल्याने वर्षभर दर दिवशी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे तेथे लोकांना सोईसुविधा देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा गरजेची आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखू सेवन याला प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या (सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा) ‘कोटपा’ कायद्याची अंमलबजावणी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने काटेकोरपणे करण्यात आली.