Farmers protest शेतकरी आणि पोलिसांमध्ये पंजाब-हरियाणा येथील शंभू सीमेवर ताणाव निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे गेलेल्या मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले असता शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी तोडून जाण्याचा प्रयत्न केला असून आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या २१ गोळ्या झाडण्यात आले. यावेळी प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला असून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सहा शेतकरी जखमी झाले आहेत.
Read More
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी २ डिसेंबर रोजी संसद भवनच्या परिसराकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्यांतर्गत लाभ आणि नुकसानभरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतला आहे.
'राजकीय हेतू असलेले काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याचा वापर करतात तेव्हा वाईट वाटते. शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय आंदोलन केले जाते तेव्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय निवडणुकीतील डावपेच बंद झाले पाहिजेत.', असे म्हणत भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. (Bharatiya Kisan Sangh)
'भारतीय किसान युनियन'चे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आता दिल्लीतील संसद भवनाला ४० लाख ट्रॅक्टरने घेराव घालण्याची धमकी दिली आहे. दिल्लीच्या सीमेवरून शेतकरी परतण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी शेतकरी नेत्यांना मिळालेला पाठिंबादेखील संपला आहे. म्हणून धक्का बसलेल्या टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारला धमकी दिली आहे. राकेश टिकैत यांनी मंगळवारी सांगितले की, शेतकऱ्यांनी तयार रहावे. कारण, यावेळी ४ लाख ट्रॅक्टर नाही, तर ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेला घेराव घालायचा आहे.
पवारांनी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.