संजय राठोड यांनी राजीनामा का द्यावा? 'ही' आहेत कारणे!

    24-Feb-2021
Total Views |

sanjay rathod 1 _1 &
 


राठोड राजीनामा देणार का ?

मुंबई : स्वतःला बंजारा समाजाचे नेतृत्व मानणारे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा काही क्षणातच उद्धव ठाकरे स्वीकारतील, अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी राठोड यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर चर्चगेट येथील निवासस्थानी राठोड दाखल झाले आहेत. राठोड यांच्यातील दोन तास चर्चा झाली. त्यांनी राजीनामा दिला की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्याची वेळ आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर का आली आहे त्याची 'ही' आहेत कारणे!
 
 
१. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचे थेट नाव
 
 
२. राज्य सरकारच्या एका महत्वाच्या मंत्र्याचे नाव एका मुलीच्या हत्या प्रकरणात आल्याने नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो.
 
 
३. पूजा प्रकरणाशी संबंध नसताना राठोड यांनी शक्ती प्रदर्शन का केले ?
 
 
४. १५ दिवस राठोड अज्ञातवासात का होते ?
 
 
५. शिवसेनेच्या महिला आघाडीबद्दल प्रश्न चिन्ह : इतर कुठल्याही प्रकरणी ज्यावेळी महिलांचे प्रश्न येतात त्यावेळी महिला शिवसैनिक निषेध व्यक्त करण्यासाठी आघाडीवर असतात. मात्र, राठोड प्रकरणात कुठल्याही महिला नेत्याने प्रतिक्रीया दिली नाही.
 
 
६. राठोड यांच्यावर महाविकास आघाडीतील सर्व नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
 
 
७. पूजाच्या लॅपटोपमध्ये आढळलेल्या फोटोंवरून तसेच रेकॉर्डींगवरून संशय बळावत आहे.
 
 
८. शक्तीप्रदर्शन करून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा करून चुकीचा पायंडा राठोड यांनी पाडला.
अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121