"उद्धव ठाकरेंभोवतीच्या बडव्यांनीच शिवसेना संपवली"

रामदास कदम यांचा घणाघात

    07-Aug-2022
Total Views | 77

ramdas
 
मुंबई : "उद्धव ठाकरे यांच्या भोवतीच्या बडव्यांनीच त्यातही मिलिंद नार्वेकरांनीच अर्धी शिवसेना संपवली, कशी संपवली हे उद्धव यांना कळले सुद्धा नाही" अशा शब्दांत आरोप करत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या आताच्या स्थितीला हेच उद्धव यांचे निकटवर्तीय त्यातही मिलिंद नार्वेकर हेच जास्त जबाबदार आहेत असा थेट आरोप रामदास कदम यांनी केला आहे.हे आरोप करताना देखील त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कुठलेही आरोप करण्याचे टाळले.
 
 
शिवसेनेत नार्वेकरांनी एक पद्धत सुरु केली होती, त्यांना उद्धव ठाकरेंना थेट भेटलेले आवडायचे नाही. उद्धव ठाकरेंआधी नार्वेकरांना भेटयोला लागायचे, त्यांची इच्छा झाली कीच आपल्याला उद्धव यांची भेट मिळायची. हे अशा पद्धतीने झाले नाही की पुढच्या निवडणुकीत त्या व्यक्तीचे तिकीट कापले जायचे. सगळ्या शिवसैनिकांना म्हणजे आमदार, नगरसेवक, खासदार सगळ्यांना समान न्याय होता कोणीच यातून सुटले नव्हते. सगळ्या शिवसेनेत नार्वेकरांच्या समोर बोलायची कोणाची हिम्मत नव्हती कारण त्यांना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता.
 
 
आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युतीच होऊ दिली नसती, त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय हेच मान्य झाले नसते. आज ज्या शिवसैनिकांनी उठाव केला आहे त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलले जात आहे, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे समाज पसरवले जात आहेत. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे असे कदम यांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121