अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांची प्रलंबित विशेष भरती प्रक्रिया पूर्ण करा : मुनगंटीवार

महिनाभराच्या आत जाहीरात प्रसिध्‍द करण्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

    01-Dec-2022
Total Views | 49

सुधीर मुनगंटीवार
 
 
 
 
 
 
मुंबई : राज्‍यातील अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची विशेष पदभरती प्रक्रिया प्रलंबित असल्‍यामुळे बेरोजगार आदिवासी उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरलेला आहे. ही पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडे केलेली आहे. येत्‍या एक महिन्‍यात ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
 
 
 
 
अनुसुचित जमातीच्‍या उमेदवारांच्‍या प्रलंबित पदभरतीबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. दिनांक १० मार्च २०२२ रोजी सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयासंदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
 
 
 
अनुसुचित जमातीची वर्ग १ ते ४ पर्यंतची प्रलंबित विशेष पदभरती प्रक्रिया महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगासह इतर प्राधिकरणांनी जाहीराती देवून पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे. न्‍यायालयीन आदेशाप्रमाणे व दिनांक २१ डिसेंबर २०१९ च्‍या शासन निर्णयानुसार शासकीय तसेच खाजगी अनुदानित संस्‍थातील पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे.
 
 
 
 
सर्वोच्‍च न्‍यायालयाने सिव्‍हील अपील क्रमांक ८९२८/२०१५ व इतर याचिकानुसार दिनांक ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्‍या निर्णयाची राज्‍यात अंमलबजावणी करण्‍याच्‍या दृष्‍टीने सामान्‍य प्रशासन विभागाने दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्‍यामुळे अनुसुचित जमातीतील बेरोजगार उमेदवारांमध्‍ये असंतोष पसरला आहे, त्‍यामुळे ही प्रलंबित पदभरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्‍याची मागणी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली होती.
 
 
 
 
या चर्चेदरम्‍यान तत्‍कालीन सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन देवूनही ही पदभरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आश्‍वासनपूर्तीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी तत्‍कालीन सामान्‍य प्रशासन राज्‍यमंत्र्यांना व तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांना स्‍मरणपत्रे देखील पाठविली, मात्र तत्‍कालीन सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. नुकत्‍याच झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका महिन्‍यात याबाबत त्‍वरेने जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असे आश्‍वासन सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121