आसाममधील पूरग्रस्त भागात स्वयंसेवकांचे मदतकार्य !

    20-Jul-2019
Total Views | 371


 


गुवाहाटी : नैसर्गिक आपत्ती असो किंवा देशावरील कोणतेही संकट असो या काळात रा. स्व. संघ व स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदतीला धावून येत असतात. संकटकाळी रा. स्व. संघ मदतीला धावून आल्याची अनेक उदाहरणे देशाने पहिली आहेत. असेच एक उदाहरण सध्या आसाममध्ये पाहायला मिळत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारतीचे स्वयंसेवक आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. संघाच्या स्वयंसेवकांतर्फे पूरग्रस्तांना अन्न, पाण्यासह इतर जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठीही स्वयंसेवक कार्यरत असल्याची माहिती विश्व संवाद केंद्राने दिली.


आसामच्या २८ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून तब्बल ३० लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने सांगितले. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने ३२७ केंद्र उभारले आहेत. यात १६ हजार ५९६ नागरिकांनी आश्रय घेतला आहे. ज्यांना मदत मिळाली नाही अशा ठिकाणी जाऊन स्वयंसेवक त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. नलबारी आणि दारंग येथे कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांचे फोटो विश्व संवाद केंद्राने शेअर केले आहेत. त्यामुळे स्वयंसेवक नेहमीप्रमाणे निस्वार्थी भावनेने देशवासीयांच्या मदतीला धावून आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले...

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!*

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121