काळा दिन अन् मोर्चा

    17-Nov-2018
Total Views | 11

संत रामपालवरील आरोप मागे घ्या, मुक्तता करा...

जळगाव, 16 नोव्हेंबर
कबीरपंथी संत रामपालजी महाराज यांच्यावरील निखालस खोटे आरोप मागे घ्यावेत आणि त्यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी 18 रोजी त्यांच्या अनुयायांतर्फे देशभर काळा दिन पाळला जाणार असून शांततापूर्ण मोर्चा (रॅली) काढण्यात येणार आहे.
 
जळगावात रविवारी हा मोर्चा सकाळी 8 वाजता डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून निघेल...टॉवर, नेहरु चौक, शिवपुतळा, बसस्थानक, स्वातंत्र्यचौकमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 वाजता जाईल आणि जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले जाईल.
 
सहभागाचे आवाहन शिवाजी रामसिंग पाटील, जितेंद्र अशोक पवार, अनंत भानुदास पाटील आदी भक्तगणांनी केले आहे.
संत रामलालजी महाराज यांचे सामाजिक सुधारणा, परिवर्तनात मोठे योगदान आहे,
 
त्यांचा एकही अनुयायी कोणतेही व्यसन करीत नाही, हुंडा देत व घेतही नाही.अपहार करीत नाही... हरयाणा सरकारने अत्याचार करीत त्यांना अनेक गुन्ह्यांमध्ये गोवले आहे, त्यातील 6 खटल्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे, असेही भक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121