राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने विकास करत असल्याचेच यातून अधोरेखित झाले आहे.
Read More
राजकीय स्थिरता असेल तर धोरणकर्त्यांना व्यापक देशहिताची धोरणे राबवता येतात. तसेच ही स्थिरता गुंतवणुकीला आकर्षित करणारी ठरते. नव्याने झालेली गुंतवणूक रोजगार आणि आर्थिक वाढीला चालना देते. स्थिर सरकार असेल तर ते उद्योगव्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करते. भारत आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातो. तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा भारताचा मार्गही स्थिरताच मोकळा करणार आहे.