पारतंत्र्याच्या ढगांनी व्यापलेल्या आभाळाच्या क्षितिजावर पूर्व-पश्चिम दिशांना दोन तारे उगवले. सशस्त्र क्रांतीचा ध्यास उराशी तेवता ठेवून नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोलकात्यात सुभाषबाबू. दोघांमध्ये समान धागे ठळकपणे स्पष्टपणे दिसतात. आपल्या दुर्भाग्यामुळे, नाकर्तेपणामुळे या तार्यांचं तेज आपण पेलवू शकलो नाही. आभासी सेक्युलॅरिझममुळे आपल्या देशाचं आजपर्यंत फक्त नुकसानच झालंय. अशा या दोन महान नेत्यांच्या भेटीची ही कहाणी...
Read More
“केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या हिंदूराष्ट्राला पावन करणारं हे मंदिर आहे,”असे प्रतिपादन तात्यांनी ‘पतितपावन’ या नावाचं मर्म उलगडताना केलं होतं. तेव्हा, या पतितपावन मंदिर उभारणीमागची स्वा. सावरकरांची प्रेरणा आणि चिंतन यावर प्रकाश टाकणारा हा लेख...