भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झालं आहे. या देशांमध्ये खेळाडू वृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजित होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात होतात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एका राज्याची राजकीय लॉबी घुसली आहे. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
Read More
भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २४० धावा फलकावर लावू शकला.
आयसीसी विश्वचषक २०२३ मधील महामुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे सुरू आहे. भारत या सामन्यात जिंकण्याची शक्यता जास्त वर्तविली जात आहे. भारताने होम ग्राऊंडवर खेळताना विश्चचषकातील एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या भारत आणि पाक सामन्यात तिकीटविक्री सुरु झाल्याबरोबर भारतीय क्रिकेटरसिकांनी विशेषकरून या सामन्याला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. या सामन्याची विक्रमी तिकीटविक्री झाल्याचे पाहायला मिळाले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर येत्या १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्याआधीच स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल मुंबई पोलिसांना आला होता. या मेलमुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वनडे विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याची सुरुवात ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. फायनल १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यापूर्वी आयसीसीने विश्वचषक ट्रॉफी अवकाशात पाठवून लॉन्च केली होती. आता ही ट्रॉफी जगभरातील १८ देशांमध्ये पाठवली जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरु होणार आहे. मॅचचा आजचा पहिला दिवस खास आहे. कारण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा उत्साह वाढवण्यासाठी दोन्ही देशाचे पंतप्रधान मैदानावर उपस्थित असतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाल्यावर पंतप्रधान मोदींनी गळाभेट घेऊन स्टेडियममध्ये त्यांच स्वागत केलं.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल (२९ मे रोजी) आयपीएल २०२२ चा समारोप झाला. यावेळी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता १ लाख ३० हजार होती. स्टेडियममध्ये उपस्थित १ लाखपेक्षा जास्त प्रेक्षकांनी ‘वंदे मातरम्’ चे सामुहिक गायन केले. १ लाख लोकांनी सामूहिक 'वंदे मातरम्' गाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरूद्ध एक हजारावा एकदिवसीय सामना खेळल्याने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. क्रिकेटविश्वात एक हजारावा एकदिवसीय सामना खेळणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. एक हजार सामने खेळणे हे क्रिकेटविश्वात आतापर्यंत केवळ भारतालाच शक्य झाले आहे. हे केवळ भारतालाच का जमले, याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच दिवसीय टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी ५० टक्के प्रेक्षकांची मर्यादा घालण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आली. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. १ लाख ३२ हजार क्षमता असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ६६ हजार प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे.