नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट’ असा उल्लेख मिळवणाऱ्या या महाकाव्यावर निर्मात्यांनी अफाट खर्च केला असून, त्यामुळेच हा चित्रपट ‘हिट’ ठरवण्यासाठीही त्याला तितक्याच मोठ्या संख्येने कमाई करावी लागणार आहे.
Read More
पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत "माय गो विठ्ठल" नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधूर आवाजात त्यांनी हे गाणं गायलं आहे.
लंडन पाठोपाठ न्यूयॉर्कसारख्या महानगराच्या महापौरपदी मुस्लीमधर्मीय झोहरान ममदानी यांची निवड झाल्यास, त्यातूनही एक राजकीय संदेश जातो. जगातील सर्वच लोकशाही देशांमध्ये डावे उदारमतवादी पक्ष टोकाची डावी भूमिका घेऊ लागले असून, मार्क्सवादी आणि इस्लामिक मूलतत्त्ववादी यांची ही युती सगळ्यांसाठीच चिंता वाढवणारी म्हणावी लागेल.
रामायणात, रामाने सामान्य लोकांना एक ध्येय दिले आणि रावणाची शक्ती नष्ट केली. आपल्या सर्वांना दिशा देण्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. समाजात अनेक चुकीच्या कथा निर्माण झाल्या आहेत ज्या खूप खोलवर रुजल्या आहेत आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करण्याची जबाबदारी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश सोनी यांनी केले.
राजकीय पटलावर उदयास आलेल्या काही व्यक्ती, त्यांच्या विचारसरणी आणि धोरणांमुळे व्यापक चर्चेचा विषय बनतात. झोहरान ममदानी हे असेच एक नाव. त्यांचे विचार आणि जाहीर विधाने केवळ एका विशिष्ट शहरापुरती मर्यादित नसून त्यांचे जागतिक परिणाम होऊ शकतात. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. अमेरिकेत सध्या दोन विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. एक म्हणजे ट्रम्प यांचे धरसोड वृत्तीचे धोरण आणि न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत जिंकलेला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार झोहरान ममदानी!
दादरस्थित जुन्या महापौर बंगल्याचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
(Kangana Ranaut on Zohran Mamdani) भारतीय अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत हिने न्यू यॉर्कच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "जोहरान ममदानी भारतीयांपेक्षा जास्त पाकिस्तानी वाटतो", असे कंगना यांनी गुरुवारी, २६ जून रोजी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच एवढ
कोल्हापूर महानगरपालिकेतील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या हेच जीवनकार्य जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठ
मयुरी जगताप हिने केलेल्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मयुरीशी संबंधित गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यास दिरंगाई झाली असून त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक कलाकार समोर आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Social Institution Empowerment’ was held on May 11th at Ghatkopar West समाज घडवणार्या संस्थांची ताकद वाढवण्यासाठी विचार आणि कृतीच्या एका मंचावर सामाजिक संस्था एकत्र आल्या. अशा आशयाचा आणि उद्दिष्टाचा ‘सामाजिक संस्था सशक्तीकरणपरिसंवाद’ हा कार्यक्रम दि. 11 मे रेाजी घाटकोपर पश्चिम येथील परम केशव बाग येथे अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.
(Nandu Parab on BJP KDMC mayor ) भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असून कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाच महापौर बसविणार असा विश्वास नवनिर्वाचित कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला.
(Hearing on petitions challenging the Waqf Act on May 15) सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ‘वक्फ (सुधारणा) कायदा, 2025’ला आव्हान देणार्या याचिकांची सुनावणी गुरुवार, दि. 15 मे रोजी भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवली आहे.
तुम्ही जेव्हा आशय निर्मिती क्षेत्रात असता त्यावेळी फक्त नकारात्मक गोष्टी दाखवण्यापेक्षा काय जगात काय सुंदर आहे, या गोष्टीही दाखवा, असे परखड मत युट्युबर मायो मौरसकी यांनी व्यक्त केले. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद २०२५ (व्हेवज) येथे आयोजित 'बिझनेस ऑफ इन्फ्लुइन्स क्रिएटर्स शेपिंग ग्लोबल कल्चर' या चर्चा सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी शेफ रणवीर ब्रार, युट्यूबर आकाश जाधव आणि जितेंद्र अडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd
विक्रोळी परिसरात विक्रोळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डवर दि. १ जानेवारी हीच जन्मतारीख नमूद करण्यात आली असून पत्ता साहेबगंज, झारखंडचा दर्शवण्यात आला आहे. विक्रोळी येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी मार्केटमध्ये रविवार, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता भेट दिली. यावेळी, त्यांना डझनभर संशयित फेरीवाले आढळले. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी)नवे महापौर म्हणून राजा इक्बाल सिंग यांची निवड झाली आहे. महापौर निवडणुकीत एकूण १४२ मते पडली, त्यापैकी राजा इक्बाल सिंग यांना १३३ मते मिळाली.
Dr. Mayur Nandikar ‘दी लिनियन सोसायटी ऑफ लंडन’ या निसर्ग विज्ञान विषयातील जगातील सर्वांत जुन्या संस्थेकडून ‘फेलो’ म्हणून निवड झालेले वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. मयुर धोंडिराम नंदीकर यांच्याविषयी...
प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्ताने भारतीयांचे परदेशगमन होत असे. प्राचीन काळी व्यापार, धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्ताने भारतातील व्यापारी, क्षत्रिय, बौद्ध भिक्खू देशाबाहेर पडले. आणि त्यांनी आपल्या सोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ठेवा – आपली संस्कृती. अशाच लाटा इंडोनेशियाच्या किनाऱ्यांवर आदळल्या आणि इथे रुजला रामकथेचा वेल.
Mayawati's niece उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भाचीने (Mayawati's niece) आपला पती आणि सासरच्यांवर हुंड्यावरून गुन्हा दाखल केला आहे. यावरून आता न्यायालयाने आदेश दिले आहेत की, हापुड कोतवालीत पती, सासू, साजरे,नणंद, मेहुणा, वहिनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मायावरतीची भाची एलिस ने ५० लाख रुपये हुंडा आणि फ्लॅट मागितल्याचा आरोप केला आहे. अशातच पती विशाल हा नपुंसक असल्याचा दावाही तिने केला आहे.
रामानंद सागर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली 'रामायण' ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आजही अढळ स्थान मिळवून आहे. या मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण या भूमिकांमुळे संबंधित कलाकार घराघरांत पोहोचले. अरुण गोविल यांनी रामाची, तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. या जोडीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून आजही त्यांचं तितकंच प्रेम मिळतं.
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
Sri Lanka Ramayana हिंद महासागरातील श्रीलंका हे केवळ एक निसर्गरम्य द्वीपराष्ट्र नाही, तर भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेले महत्त्वपूर्ण पौराणिक स्थळसुद्धा आहे. रामायणात प्रसिद्ध असलेली ही सोन्याची लंका म्हणजेच रावणाचे साम्राज्य होते. श्रीलंकेत आजही रामायणकालीन स्थळे जसे की अशोकवन, केलानिया बिभीषण मंदिर, रामसेतू आणि दिवूरुमवेला अस्तित्वात आहेत. रामायणातील प्रसंग तिथे जिवंत वाटतात. निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक स्थळे आणि श्रद्धेचा संगम असलेले ही भूमी भारतीयांसाठी केवळ एक पर्यटनस्थळ नसून, एक भावनिक नाते जपणारे पव
Lord Shree Ram रामायण हे केवळ एक महाकाव्य नसून, संपूर्ण दक्षिण आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. नेपाळमध्ये या रामकथेचे विशेष स्थान. नेपाळमधील जनकपूर ही माता सीतेची जन्मभूमी मानली जाते, तर भानुभक्त आचार्यांनी वाल्मिकी रामायणाचे नेपाळी भाषांतर करून ते रामायण नेपाळमधील घराघरांत पोहोचविले. त्यांच्या साहित्यामुळे रामायण केवळ एक धर्मग्रंथ न राहता, नेपाळी जनतेच्या जीवनशैलीचा भाग झाले. नेपाळमधील रामकथेची ही परंपरा भारताशी सांस्कृतिक संबंध दृढ करत असून, रामायणातील मूल्यांचा प्रसार देखील सर्वदू
Ram Navami 2025 तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
Ramnavami 2025 वाल्मिकी ऋषींची गेली हजारो वर्षे मानवी मनाला शांत करणारी रसाळ मधुकथा म्हणजेच रामकथा. राम आणि सीतेची ही सुंदर कथा खूप प्राचीन. काळाची पाऊले जशी पुढे पडायला लागली, तशी ही कथा केवळ भारताची राहिली नाही, तर ती देशांच्या सीमा ओलांडून हिमालयापारही गेली. देशोदेशीचे राजकीय संबंध बदलत राहिले, नवीन सामाजिक परिस्थिती आकाराला आली आणि माणसाच्या एकूणच राहणीमान, जीवनमानातील स्थित्यंतरांनी प्रगतीचा आलेख गाठला. पण, या सगळ्या बदलांना तोंड देत, ही मधुर कथा देशविदेशातील विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखात रुळली.
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
Ramnavami 2025 रामायणाचे खोतानी स्वरुपखोतान राज्याच्या भूमीत, भारतीय परंपरेतील रामायण एका वेगळ्या रूपात साकारलेले आजही पाहायला मिळते. भाषा वेगळी, परंपरांची वळणं वेगळी, पण कथा तीच; धर्म, सत्य आणि आदर्शाचं तेज जपणारी! वेळ बदलली, ठिकाण बदलले, पण ही कथा आजही लोकांच्या मनांत त्याच श्रद्धेने घर करून आहे. खोतानी रामायण वाचताना, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवल्याचा भास आपल्याला होतो, जिथे परंपरा आणि श्रद्धांच्या अतूट धाग्यांनी विणलेली ही रामायणाची नक्षी नव्या अर्थांनी समोर येते.
Japanese Ramayana रामकथेचे मूळ हिंदुस्थानात असले तरी भारतीय व्यापारी आणि बौद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारातून रामायण अगदी पूर्वेकडील जपानपर्यंतही पोहोचले. साहजिकच, रामायणाची कथा जपानच्या संस्कृतीरंगात न्हाहून निघाली, वेगळ्या पद्धतीने विकसितही झाली आणि तितकीच लोकप्रियही ठरली. त्यानिमित्ताने जपानी साहित्य, संस्कृती आणि सिनेमासारख्या नवमाध्यमांतही रामायणाच्या पाऊलखुणा दिसून येतात. अशा या जपानी रामायणाच्या संपन्न परंपरेचा सविस्तर आढावा घेणाराहा लेख...
भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक, व्यापारी अशा विविध प्रकारे भारताशी जोडला गेलेला देश म्हणजे म्यानमार उर्फ ब्रह्मदेश. अशा ब्रह्मदेशात रामकथेचे अयन झाले नसते, तरच नवल! तेव्हा, म्यानमारच्या जनमनामध्ये रुजलेल्या रामकथेविषयी...
Shree Ram भारत आणि इंडोनेशिया यांचे संबंध केवळ भौगोलिक सीमांपुरते मर्यादित नाहीत, तर ते सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बंधांनीही घट्ट विणलेले आहेत. निळ्याशार हिंद महासागराच्या लाटांइतक्याच खोल आणि अनंत या दोन्ही देशांच्या परंपरा आहेत. भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या निसर्गसंपन्न द्वीपसमूहात दरवळतो आणि तेथे रामायणाची गाथा आजही जिवंत आहे. हिंदुस्थानात जन्मलेल्या या महाकाव्याने इंडोनेशियात नवीन अर्थ, नवे रंग स्वरुप धारण केले. स्थानिक लोककला, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडो
आग्नेय आशियाई देशांपैकी रामायणाच्या सर्वाधिक पाऊलखुणा आजही कुठे दृष्टिपथास पडत असतील, तर तो देश म्हणजे थायलंड. तेथील राजांच्या नावापासून ते अगदी मंदिरे, शिल्पकला आणि एकूणच समाजजीवनात रामकथेचा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो. थायलंडचा राष्ट्रीय ग्रंथच ‘रामाकियन रामायण.’ असे हे थायलंडचे रामायणाशी असलेले ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
भारतापलीकडील रामायण असा विचार करताच, नजर आपसूकच आग्नेय आशियाकडे वळते. पण, रामकथेच्या संस्कृतीसंपन्न परंपरेने सातासमुद्रापार अगदी युरोपीय अभ्यासकांना, साहित्यिकांनीही भुरळ घातली. म्हणूनच केवळ फ्रेंच किंवा जर्मनच नव्हे, तर इटालियन, पोलिश, रशियन भाषेतही रामायणाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आणि ती युरोपीय जनमानसानेही मनस्वी स्वीकारलेले दिसतात. त्यानिमित्ताने युरोपीय जनमनातील रामकथेच्या रामरंगाचा मागोवा घेणारा हा लेख...
Ram Navami 2025 मालदीव... भारताच्या नैऋत्येकडील द्वीपराष्ट्र. ज्याप्रमाणे आग्नेय आशियात रामकथेचा सुगंध तेथील कणाकणांत दरवळलेला दिसतो, तसे चित्र इस्लामिक मालदीवमध्ये नाही. पण, अगदी रामाचे गुरु असलेल्या अगस्ती ऋषींनी मालदीव पादाक्रांत केले होते. एवढेच नाही, तर रामायणातील लंका ही आजची श्रीलंका नसून, श्रीलंकेच्या दक्षिणेला मूळात मालदीवजवळचेच एक द्वीप असल्याचाही दावा केले जातात. त्याचबरोबर मालदीवच्या लोककथांमध्ये राम आणि सीतेशी साधर्म्य साधणारी धोन हियाल आणि अली फुल्हूची कथा आजही गायली जाते. त्याचाचा मागोवा घेण
( Devendra Fadnavis on action mode Instructions to all departments work details on the website by May 1 ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात ‘१०० दिवसांसाठीचा कृती आराखडा’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली. त्यामुळे या कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. येत्या दि. १ मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर संकल्पित केलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या काळात स्त्री घराच्या बाहेर पडत नसे, त्या काळात निर्मलाताई लव्हाटे नऊवारी साडी नेसून घराबाहेर पडत, सायकल चालवत शेतमळ्यात जात. शेतीभाती, घरदार आणि त्यासोबतच समाजासाठीही सत्कर्म करणार्या निर्मलाताई आज 92 वर्षांच्या आहेत. आजही त्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल नाही. तोच उत्साह, तीच निष्ठा, तीच प्रेरणा. तर अशा या कर्मयोगिनी निर्मलाताई लव्हाटे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
तुर्कस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांना तुर्कीच्या सरकारने अटक केली. या घटनेमुळे तुर्कस्तानच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचे स्वरूप आणि राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांची राजकीय दिशा, याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. इमामोग्लू यांना सरकारी निधीच्या कथित गैरवापराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. इस्तंबूल महानगरपालिकेच्या काही विकासकामांमध्ये नियमभंग आणि अपारदर्शकता आढळून आल्याचा, तप
बसपाच्या राष्ट्रीय समन्वयक पदावरुन आपल्या पुतण्याला, आकाश आनंदला पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकतेच पदमुक्त केले. राजकारणाला घराणेशाही जशी नवीन नाही, तसेच राजकीय पक्षांनाही गृहकलहाचा तर पिढीजात शाप!त्याचीच प्रचिती मायावतींच्या या टोकाच्या निर्णयातून जगजाहीर झाली.
Torve Ramayana दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यातील ‘कन्नड’ ही एक सशक्त व समृद्ध भाषा. या भाषेतील वचनसाहित्याचा ठेवा कन्नड भाषेचे वैभव आहे. महात्मा बसवेश्वर, योगिनी अक्कमहादेवी, संत पुरंदास आदी संतांचे कन्नड साहित्यात विशेष योगदान आहे. कर्नाटकमध्ये शैव आणि वैष्णव, अशा दोन्ही भक्तिधारा पूर्वीपासून विद्यमान आहेत. वनवास काळात किष्किंधा अरण्यातील वानराज वाली-सुग्रीव यांच्या राज्यात श्रीरामाचे वास्तव्य होते. किष्किंधा विद्यमान कर्नाटक राज्यातील हम्पी परिसरात आहे. अशा प्रकारे कर्नाटकची भूमी श्रीराम-लक्ष्मणांच्या च
वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. २७ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यासाठी तिला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे आपल्याविरोधात मुंबई आणि आसामच्या गुवाहाटी येथे दाखल झालेल्या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लील सामग्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यूट्यूबवरील अश्लीलतेवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. हा मुद्दा यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया याने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. रणवीर अल्लाबादियाने कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या यूट्यूब शोमध्ये एका अशोभनीय विनोद केल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल झाल्या होत्या. या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी त्याने केली होती.
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ बीअर बायसेप्स याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भावनिक होताना दिसतोय, "मला खूप वाईट वाटतंय कारण सगळं काम थांबलं आहे. मला असं वाटतंय की मी दोषी आहे. पूर्ण टीमला मी असं एक्सपोज केलं. माझ्यामुळे सगळं काम थांबलं."
इंडियाज गॉट लॅटेंट या यूट्यूब शोवरील रणवीर अल्लाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, शोचे निर्माता आणि प्रसिद्ध कॉमेडियन समय रैना याला त्याचा मित्र मुनावर फारुकीने पाठिंबा दिला आहे.