तालुक्याची लोकसंख्या जवळपास 30 लाखाच्या आसपास आहे, त्यानुसार या भागात जवळपास आठ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्था, १५ पत पेढ्या, 3 नागरी सहकारी बँका, १९ सेवा संस्था व १ बाजार समिती आहेत. परंतु वसई तालुक्यात एकच उपनिबंधक कार्यालय असल्यामुळे, नागरिकांना विविध कामांसाठी किंवा तक्रारीचे निवारण करण्यासाठी वसई येथील उपनिबंधक कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात, यामुळे नागरिकांची वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी मंगळवार दिनांक १० जून रोजी महाराष्ट्र सरकारचे सहकार राज्
Read More
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
खानिवडे : “वसई-विरार जिल्ह्यात राजकीय परिवर्तन घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. समाजाला कृतिशील व लोकाभिमुख कारभाराचे परिवर्तन द्यावयाचे असून, त्या दृष्टिकोनातून सातत्यपूर्वक प्रयत्न सुरूच राहतील,” अशी ग्वाही भाजपचे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ( Mahendra Patil ) यांनी दिली.
खानिवडे : “आज २१व्या शतकात भारताचा महासत्ता म्हणून उदय होत आहे. नालासोपारा, विरार-वसई हे या महासत्तेतील महानगर आहे. अलीकडे विकसित होत असलेल्या या ऐतिहासिक शहरातील स्वतःच्या घरकुलाबाबत अपेक्षा केवळ टोलेजंग इमारती आणि रस्ते नव्हेत किंवा केवळ रात्री पाठ टेकण्यापुरती जागा असेही नाही. मुलांचे शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, वाहतूक खेळासाठी क्रीडांगण-मैदाने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा, रोजगार अशा दैनंदिन व सांस्कृतिक गरजा याच शहरात पूर्ण व्हायला हव्या. केवळ मुंबईसाठी काम करणार्या लोकांची वसाहत नको, तर एक स्वावलंबी शहर हव