राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा आज निर्णायक दिवस असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मेळावे बोलवण्यात आले आहेत. यात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या शरद पवार गटाच्या मेळाव्याला अवघ्या १२ ते १४ आमदारांचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू असलेल्या बैठकीला
Read More
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला. पण अजितदादासोबत गेलेले दोन आमदार आता शरद पवारांच्या गटात परतले आहेत.
"मी मतदान करेन त्यावेळी मला संजय राऊतांना सोबत नेऊ द्यावं. नाहीतर या निवडणुकीत ठाकरे सरकारच्या एखाद्या उमेदवाराचा पराभव झाल्यास ते पुन्हा आमच्यावरच खापर फोडतील.", असे म्हणत शुक्रवारी (दि. १७ जून) अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'माझ्या मतदानाचा अधिकारही त्यांनाच देऊन टाका, म्हणजे त्यांना शंका घ्यायला कारणच उरणार नाही.', असेही ते पुढे म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत काल भाजपाने दणदणीत विजय मिळवत यश संपादन केलं. अपक्षांनी दगाफटका केला त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली.