राज्यसभेत उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवरून सुरू असलेल्या राजकारणाला खासदार उदयनराजे यांनी पूर्णविराम दिला आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा दिला असता, केवळ छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांचा हा डाव आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांनी समाचार घेतला आहे.
Read More
दोन दिवसांपूर्वी अक्षय बोऱ्हाडे या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये हा तरुण दावा करत आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली आहे.
सत्तेसाठी पवारांच्या दारात पडून राहणार्या पट्टेवाल्याकडून आपल्या मालकाचा लाळघोटेपणा आणि शिवरायांच्या वंशजांचा अपमान होणे साहजिकच. कारण त्यावरच तर संजय राऊत व त्यांच्या सवंगड्यांची रोजीरोटी अवलंबून, ती टिकून राहावी, नेहमीनेहमी मिळावी म्हणूनच लोचटपणा करता करता ते असे बरळले.