महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे ‘मातृभाषेतून शिक्षण’ हा मूलभूत विचार अधोरेखित करण्याबरोबरच, संघ हिंदी भाषा अन्य भाषकांवर लादू इच्छितो, या अपप्रचारही आता धुळीस मिळाला आहे. मातृभाषा
Read More
सध्या महाराष्ट्रात भाषावादावरुन वादंग उठलेला दिसतो. पण, या विषयाच्या अधिक खोलात गेल्यास लक्षात येते की, या वादाची मुळे ही वसाहतवादी मानसिकतेत आहेत. त्यानिमित्ताने वैचारिक वसाहतवादाची पायाभरणी करणार्या या भाषिक वसाहतवादाचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, असे संघाचे मत असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे
(Sushil Kedia) गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या मराठी - हिंदी भाषेच्या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरुन आव्हान दिले आहे. केडिया यांनी राज ठाकरे यांना एक्सवर टॅग करत 'आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' अशी पोस्ट केली आहे.
मीरारोडच्या परराज्यातील हिंदी भाषिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री यागेश कदम यांनी हॉटेल मालकाला सज्जड दम देताना म्हणाले की, “महाराष्ट्रात राहतोस तर तूला मराठी बोलता यायलाच हवी, येत नाही वैगरे महाराष्ट्रात एकून घेतले जाणार नाही. येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न कर.” असा दम मंत्री कदम यांनी दुकान मालकाला दिला आहे.
मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा केवळ कागदोपत्री न राहता, जनमानसात रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठीच्या गौरवशाली अडीच हजार वर्षांच्या परंपरेचा जागर करण्यासाठी, आता दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' देखील साजरा केला जाईल, असे मराठी भाषा विभागाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती मिळणार
त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.
भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर राष्ट्राचा आत्मा आहे. भाषा जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले. दिल्लीतील अधिकृत भाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सो
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी राज्यतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, असे ते म्हणाले. बुधवार, १८ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला.
काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केला आहे. तसेच भाषेचे राजकारण सोडा आणि वस्तुस्थिती पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यभरात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून गोंधळ सुरु असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादासाठी तामिळला अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली आहे. याद्वारे पुन्हा भाषिक अस्मितेच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न स्टॅलिन यांनी केला आहे.
कमल हसन यांचा तमिळ चित्रपट 'ठग लाईफ' हा कर्नाटक वगळता संपुर्ण भारतात ५ जून ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वी हसन यांनी 'कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली', असे वक्तव्य केल्याने, कर्नाटक राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर भाषिक भावनेला ठेच पोहचल्यामुळे बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात जनहीत याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत बाबत न्यायालयाने शुक्रवारी, दि.१३ जून रोजी कर्नाटक राज्याला नोटीस बजावली आहे.
vulgar and casteist language used by director Anurag Kashyap against the Brahmin community
इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १९ एप्रिल रोजी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Compulsion Hindi Language नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर होताच, भाषिक राजकारणही पेटले. या विषयावर समाजमाध्यमांमध्येही वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यानिमित्ताने भाषा, संस्कृती, साहित्य यांच्यातील परस्पर संबंध, शिक्षणातील त्रैभाषिक सूत्र याविषयीचे विविध कंगोरे ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य आणि ‘साहित्य भारती, महाराष्ट्र’चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले.
मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबं
Hindi आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हटले की, त्यांचे नेते आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तमिळ चित्रपट आतापर्यंत हिंदी भाषेत डब करत होते. पक्षाच्या स्थापना दिनी बोलताना जनसेवा प्रमुख म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी भारताला तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असून, गेली अडीचशे वर्षे या देशात कोणत्याही एका भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वाढेल, असे काहींचे मत असले तरी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यताही आहे.
Hindi या देशात हिंदू संस्कृतीवर आघात करण्याची एक वेग़ळीच परंपरा आहे. आक्रांतांनी सुरु केलेल्या या परंपरांचे प्रामाणिक पाईक आजही भारतात आहेत. मात्र, आता विरोध थेट न करता, तो विविध रंगाढंगात केला जातो. विविध रुपांच्या माध्यमातून या पाईकांचा विरोध पुढे येतो. प्रादेशिक अस्मिता हे त्यापैकीचे एक कारण. भारतासारख्य विविधता असलेल्या देशात प्रादेशिक अस्मिता नक्कीच चूक नाही, मात्र त्याचा वापर स्वार्थासाठी व्हावा हे दुर्दैव. नेमके हेच स्टॅलिन यांना न उमगल्याने, त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि त्याच्या आडून संस्कृत भाषा आ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्या मायमराठीच्या समृद्धीसाठी महायुतीचे सरकार सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला नगराची उपमा दिलेली आहे. ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरवण्यात आलेल्या आपल्या मराठी भाषेला समजून घेताना, या नगराच्या अंतरंगाशी एकरूप होणेदेखील तितकेच गरजेचे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. काळाच्या पटलावर मराठी भाषासुद्धा अशाच वेगवेगळ्या प्रवाहांमुळे समृद्ध होत गेली. अशा या आपल्या लाडक्या मराठी भाषेला दीड हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. इ. स. ५०
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Narendra Modi राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहेत. संघामुळेच मराठी आणि महाराष्ट्राशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी विज्ञान भवनातील शानदार कार्यक्रमात केले.
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
Ramayana सुदूर पूर्वोत्तर भारतातील आसाममधील राजकवी माधव कंदलीचे रामायण, ‘असामिया’ साहित्यातील पहिले रामायण महाकाव्य आहे. गोस्वामी तुलसीदासांच्या आधी 14व्या शतकात, हा राजकवी होऊन गेला. त्याचे रामायणातील फक्त पाच कांड उपलब्ध आहेत. पुढील काळात, थोर संत शंकरदेव यांनी उरलेली आदिकांड, उत्तरकांड लिहून माधव कंदलांचे रामायण पूर्ण केले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
बोली भाषा हा भारताचा आत्मा आहे. भारतीय संस्कृती ही भाषिक संस्कृती असून तिचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी! येत्या २५ वर्षांत मराठीला ज्ञान आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी ‘मराठी भाषा धोरणा’त व्यवहारक्षेत्र निहाय शिफारसी अंतर्भूत करण्यात येत आहेत. केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर सर्व लोकव्यवहारांचे मराठीकरण होण्याकरिता महाराष्ट्रातील केंद्रीय कार्यालयांमध्येही आता ‘मराठी’ अनिवार्य केली जाणार आहे. तशी शिफारस भाषा धोरणात करण्यात आली आहे.
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
Marathi language ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबतची अधिसूचना आज दि : ८ जानेवारी २०२५ रोजी जारी केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
नवी दिल्ली : साहित्य अकादमीच्यावतीने देण्यात येणार्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ ( Sudhir Rasal ) यांना ’विंदांचे गद्यरुप’ पुस्तकासाठी यंदा हा जाहीर झाला आहे. आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याची भावना रसाळ यांनी व्यक्त केली.
मुंबई : “मराठी ( Marathi ) भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे. त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठी भाषेचा अवमान कदापी सहन करणार नाही,” अशी प्रतिक्रिया मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी दिली.
(Urdu Bhavan) मुंबई महापालिका क्षेत्रातील भायखळा मतदारसंघातील आग्रीपाडा विभागामध्ये उर्दू भाषिक अध्ययन केंद्र (उर्दू भवन) उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बेघरांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावर आरक्षण बदलून उर्दू भवनाचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याला तीव्र विरोध दर्शवत भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी महापालिकेला उर्दू भवनाचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेला पाठवले आहे.
(Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
चक्क कर्नाटकचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनाच कन्नड भाषा बोलता येत नसल्याची एका विद्यार्थ्याने ऑनलाईन कार्यक्रमात टिप्पणी केली आणि मग काय, बंगारप्पांचा अंगार शिक्षण खात्यातील अधिकार्यांना झेलावा लागला.
( Nalasopara TC ) मुंबई, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अतूट समीकरण. मात्र, नालासोपाऱ्यातील एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियासह सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपाऱ्यातील एका मुजोर टीसीने रेल्वेमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही, अशी लेखी हमी एका मराठी दाम्पत्याकडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
( Dharmendra Pradhan ) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन वर्गीकृत अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री, युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.