अॅट्रॉसिटी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयची मान्यता

    03-Apr-2018
Total Views | 23


नवी दिल्ली :
केंद्र सरकारने दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. गोयल आणि यू.यू.ललित यांच्या खंडपीठासमोर या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने दाखल केल्या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने विचारकरून यावर परत एकदा सुनावणी करण्याचे मान्य केले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायदामध्ये केल्या नव्या बदलांवर सरकारच्या बाजूने आणि समाजाच्या बाजूने पुन एकदा विचार करून बदल करणे आवश्यक असल्याचे देखील गोयल आणि ललित यांच्या खंडपीठाने मान्य केले. त्यानुसार आज दुपारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या महिन्यातील २० मार्चला सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करत, या कायद्याअंतर्गत होणाऱ्या तत्काळ अटकेवर रोक लावली होती. त्यामुळे काल देशभरातील दलित आणि वनवासी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली होती. उत्तर भारतात या या बंदला हिंसक वळण प्राप्त झाल्यामुळे तब्बल ९ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीचे देखील नुकसान झाले होते. यावर केंद्र सरकारने न्यायालयात यासंबंधी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121