…अन्यथा ‘एसबीआय नेट बॅंकींग’ बंद !

    19-Nov-2018
Total Views | 17
 

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्याच्या इंटरनेट बॅंकींग युझर्ससाठी महत्वपूर्ण घोषणा केली. खातेधारकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक बॅंकेकडे नोंदणी करायचा आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी मोबाईल क्रमांकाची नोंदणी झाल्यास ग्राहकांची नेट बॅंकींग सुविधा बंद केली जाईल. त्यामुळे तातडीने बॅंकेच्या शाखेत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन एसबीआयने खातेधारकांना केले आहे.

 
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, इंटरनेट बॅंकींग आणि मोबाईल बॅंकींग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. या प्रकरणी एसबीआयच्या संकेतस्थळावर माहीती दिली. रिझर्व्ह बॅंकेने जुलै २०१७मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार, बॅंक खात्यातील कोणत्याही व्यवहाराबद्दल ग्राहकाला तातडीने एसएमएस जाणे गरजेचे असून ग्राहकांना मोबाईल क्रमांक नोंदवण्याचे आवाहन सर्वच बॅंकांद्वारे करण्यात आले आहे.
 

मोबाईल क्रमांक अपडेटची अशी करा पडताळणी

 

तुम्ही एसबीआय खातेधारक असाल तर ऑनलाईन बॅंकींग संकेतस्थळावर लॉग इन करा, त्यानंतर माय अकाऊंट प्रोफाईलमध्ये जा. तुमचा लॉगइन पासवर्ड नोंदवल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या रकान्यात तुमचा मोबाईल दिसेल, जर दिसत नसेल तर बॅंकेच्या जवळ्च्या शाखेत जाऊन तुम्ही तो अपडेट करू शकता.

 

एटीएममध्ये करा मोबाईल क्रमांक अपडेट

 

एटीएममध्ये गेल्यानंतर डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर पिन टाका, मोबाईल रजिस्ट्रेशन पर्याय निवडा, त्यात मोबाईल क्रमांक टाका आणि पडताळणीसाठी पुन्हा क्रमांक नोंदवा. त्यानंतर स्क्रीनवर मोबाईल क्रमांक अपडेट झाल्याचा संदेश दिसेल. त्यानंतर एसबीआयचा प्रतिनिधी तुम्हाला दोन दिवसांत संपर्क करतील, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

अमेरिकन व्हिसा धोरणात बदल : भारतीयांसाठी संधी व अडथळे

परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि ..

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ २०२७ची तयारी सुरु, १,०११ कोटीच्या रेल्वे प्रवासी पायाभूत सुविधा उभारणार - केंद्रीय मंत्री वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांची बैठक

प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121