तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे निर्देश

    13-Nov-2018
Total Views |

 लोकशाहीदिनी १२६ अर्ज


जळगाव, 12 नोव्हेंबर
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
 
या लोकशाहीदिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी तक्रारदारांच्या जागेवर जाऊन जाणून घेतल्या. लोकशाहीदिनी 126 तक्रार अर्ज दाखल झाले.
 
यामध्ये सहकार, जिल्हा परिषद, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे.
 
या लोकशाही दिनास अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, चिटणीस मंदार कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त खुशाल गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला.
लोकशाहीदिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिलेत.
अग्रलेख
जरुर वाचा
म्हाडा नियुक्त विकासकच करणार मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

म्हाडा नियुक्त विकासकच करणार मोतीलाल नगरचा पुनर्विकास मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर पुनर्विकासाला परवानगी गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर नावाच्या म्हाडाच्या १४१ एकर जमिनीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवार, दि.२५ रोजी विकासक नियुक्तीबाबत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. मुंबई उपनगरतील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रकल्पात म्हाडाने काही दिवसांपूर्वीच प्रकल्प सल्लागार आणि विकास संस्था (सीडीए) म्हणून अदानी रिअॅल्टीची नियुक्ती केली...

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच!

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमा संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच!

गेले तीन दिवस थायलंड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर प्रथम गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. या संघर्षात आतापर्यंत किमान ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सैनिकांसह नागरिकांचाही समावेश आहे. एक लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. ही संघर्षमय परिस्थिती २४ जुलैपासून सुरु झाली. मिसाईल्स, तोफगोळे यांबरोबरच थायलंडने F‑16 विमानातून हल्लेही केले. या संघर्षाची भूमिका पारंपारिक सीमावादावर आधारित आहे. १९०७ च्या फ्रेंच नकाश्यामधील विभागणीवरून हा वाद भडकला आहे. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121