ज्याचे सागरावरती अधिराज्य, तोच बलवान, ही उक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली. त्यावेळी समुद्राकडून शत्रूचे धोके होते. जसे की जंजिर्याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि समुद्रामध्ये फिरणारे समुद्री चाचे. या धोक्याचे विश्लेषण करून छत्रपतींनी कोकणपट्टीच्या उथळ पाण्यामध्ये सक्षम असलेले नौदल तयार केले आणि समुद्रामध्ये सुद्धा गनिमी कावा वापरला. त्यांनी अनेक जलदुर्ग बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणार्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा भारताचा ‘नौदल दिन’ साजरा झाला, हे औचित्यपूर्ण ठरले. त्य
Read More
भारताने चीनचा वाढता धोका पाहता त्याला घेरण्यासाठी सातत्याने आश्वासक पावलेही उचलली. जागतिक स्तरावर चीनच्या वर्चस्ववादी, धटिंगणशाही भूमिकेला वैतागलेल्या देशांशी भारताने मैत्रीसंबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेतला.
अन्य देशांनी आपली बरोबरी करु नये, जेणेकरुन जगातील आपले महासत्तेचे स्थान अबाधित राहील, असे अमेरिकेचे धोरण असते. त्यातूनच अमेरिकेने अनेक देशांवर निर्बंध लादले, काही देशांशी युद्धेही केली. भारतावरही अमेरिकेने अशाप्रकारे निर्बंध लादले होतेच, पण भारत त्या निर्बंधाना पुरुन उरला, हे महत्त्वाचे. आताचा इराणबरोबरील संघर्षही असाच वर्चस्वाचा असून अमेरिकेची ‘आम्हीच सर्वोच्च’ ही वृत्तीही दिसून येते.