मुंबई लोकलने प्रवास करताना वैध तिकीट घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या मध्यमातून वारंवार केले जाते. मात्र तरीही सातत्याने तिकीट न काढता नागरिक प्रवास करताना आढळून येतात. याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे या विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विविध मोहीम आखत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात नवदुर्गा तेजस्विनी ही विशेष मोहीम राबवत तब्बल ११ हजार विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून मध्य रेल्वेने ३३ लाख ९८ हजार ५०८ इतकी रक्कम दंडापोटी वसूल केली.
Read More
डेक्कन एज्युकेशन सोसायटी'चे नविनचंद्र मेहता इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड डेव्हलोपमेंट, डी. ई. एस. मुंबई कॅम्पस दादर वेस्ट यांनी नुकताच 'नवदुर्गा २०२४ जागर स्त्री शक्तीचा' ह्या कार्यक्रमाचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन केले होते. डॉ. सुलक्षणा विसपुते विभागप्रमुखआणि संस्कृतीक समितीच्या प्रमुख याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
नागपूर जिल्ह्यातील एका गावात एकुलती एक आणि अतिशय लाडात वाढलेली शालू कोल्हे. लग्नानंतर सामान्य ग्रामीण स्त्रियांसारखंच केवळ चूल आणि मूल एवढंच तिचं विश्व. एक दिवस FEED संस्थेच्या माध्यमातून तिच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. आपला पारंपारिक मासेमारी व्यवसाय करून कितीतरी महिलांना तिने रोजगार मिळवून दिला. आजही तिचं हे काम अविरतपणे सुरु आहे. शालू कोल्हे या जलकन्येच्या कामाचा मागोवा घेणारा हा लेख...
'स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा नि आज नखशिखांत तू... तू आहेस स्थितप्रज्ञा राणी' आरशातली स्त्री आणि आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवतानाच्या या काव्यपंक्ती अनेकींच्या बाबतीत तंतोतंत खऱ्या ठरतात. अशीच एक ध्येयगंधा प्रियांका दिवटे आजच्या काळातील नवदुर्गाच....
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
नवदुर्गांपैकी आजची पाचवी देवी शीतला माता. या देवीचे मंदिर मुख्यत्वे तीन ठिकाणी पाहायला मिळते. केळवे-माहीम, दादर माहीम आणि अलिबाग. ही देवता वाडवळ समाज, गौड सारस्वत ब्राह्मण समाज आणि आगरी-कोळी या समाजबांधवांची कुलदेवता आहे. तिच्या तीन मंदिरांविषयीचे रहस्य आजच्या लेखमालेत उलगडूया.
‘मेरी आवाज ही पेहचान है’ हे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आवाज ही निसर्गाची देणगी असली तरी त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची देखभाल आणि निगा राखणे काळाची गरज आहे. त्यासाठी स्वरगंगेचा वारसा सांभाळणार्या आजच्या नवदुर्गा डॉ. सोनाली लोहार.