संशोधन तसेच विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचे विधेयक संसदेत मांडले जाईल. नवनवीन तंत्रज्ञान देशात येऊ घातलेले आहे. अशावेळी संशोधनासाठी स्वतंत्र अशा केंद्राची नितांत आवश्यकता होती. ती या संस्थेमार्फत पूर्ण केली जाणार आहे. संशोधन आणि विकास क्षेत्रातील ही ‘आत्मनिर्भरता’ निश्चितच भारताची विश्वगुरु म्हणून वाटचाल अधिक गतिमान करेल, यात शंका नाही.
Read More