कुठल्याही जाहिरातीमुळे वाद होईल इतकं तकलादू सरकार आमचं नाही. शिंदे आणि माझा प्रवास २५ वर्षांचा आहे. शिंदे आणि माझ्या एकत्र प्रवासाची चिंता नको. असं प्रत्त्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलं आहे. पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More
"आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो, तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते त्यांना जनतेने दूर केले." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते पालघरमध्ये बोलत होते. पालघरमध्ये शासन आपल्या दारी योजनेचा कार्यक्रम पालघरमध