लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. ‘छावा’मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला होता. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर "औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता" असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. अबू आझमीने केलेल्या वादग्रस्त विधानावर "औरंगजेबाची कबर उखडून टाकावी", असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले होते. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत असताना याच दरम्यान औरंगजेबाच्या थडग्याबाबत लेखक व गीतकार मनोज मुंतश
Read More
चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या "राजकमल एंटरटेनमेंट" द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनीत नवा मराठी चित्रपट "अशी ही जमवा जमवी" लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्
दक्षिण भारतीय संगीतसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि गीतकार कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत आढळली असून, त्यांना तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा कल्पनाचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कल्पना बेशुद्धावस्थेत आढळल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्या व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांना कायमच विशेष स्थान मिळालं आहे. आता या परंपरेत भर घालत, समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून नव्हे, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आहे.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ऐतिहासिक चित्रपट छावा १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आणि तब्बल दोन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने केवळ १४ दिवसांतच ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि प्रभासच्या बाहुबली २ च्या विक्रमालाही मागे टाकले आहे.