ठाणे महापालिका क्षेत्रात पंधरवड्यात एच ३ एन २ (इन्फ्लुएन्झा) च्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच इन्फ्लुएन्झाच्या रुग्ण वाढत असल्याने सतर्क राहण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.
Read More
देशासह राज्यातही पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही नंबर येत असल्याने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १,८५० आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ३० खाटा आहेत. पालिकेने म्हणटले आहे की, जेव्हा-जेव्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल.
राज्यात इन्फ्लुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, दिरंगाई करु नये, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले.एच३एन२ फ्ल्यू सदृश्य साथरोगाबाबत आरोग्य मंत्री सावंत यांनी आज विधानसभेत निवेदन केले.
राज्यात H3N2 ची रूग्ण संख्या वाढत चालली आहे. H3N2 विषाणूचे राज्यात ३५२ रूग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. H3N2 प्राणघातक नाही, वैद्यकीय उपचाराने बरा होऊ शकतो. घाबरण्याची गरज नाही, असे ही आरोग्यमंत्र्याकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आलेला असताना ओसरताच इन्फ्लुएंझा एच३एन२ या विषाणूचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांत दहशत वाढत आहे. या विषाणुची लागण झाल्यामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस एच३ एन२ या विषानूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणा या राज्यात प्रत्येकी एक अशा संख्याने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील ८२ वर्षीय हासन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती आहे. त्याचबरोबर हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाला आहे.