तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत महिलांविषयी घोर पाप घडले आहे. मात्र, असे कृत्य करणाऱ्यांना वाचविण्याचे काम राज्य सरकार करत आहे. त्यामुळे संदेशखालीच्या नारीशक्तीचे वादळ संपूर्ण बंगालमध्ये घोंघावणार आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारासात येथे भाजपतर्फे आयोजित नारीशक्तीवंदन अभिनंदन कार्यक्रमास संबोधित केले. या कार्यक्रमास संदेशखालीमधील महिलादेखील उपस्थित होत्या.
Read More