रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या हेच जीवनकार्य जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
Read More
आज पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या संन्यास दिक्षा ग्रहण तिथी अर्थात (वरुथिनी एकादशी ) पू.स्वामीजींच्या चरणी दंडवत....
यंदा १५ ऑगस्टचा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन एकत्र आले. यानिमित्ताने पारशी समाजातील स्वातंत्र्यसैनिक असणार्या काही ठळक व्यक्तींचा परिचय करुन देणारा हा लेख...
येत्या 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 141वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या कवितांचा आशय समजून घ्यावा आणि त्यांच्या संस्कृतप्रचुर साहित्याची ओळख अभ्यासू लोकांना करून द्यावी, असे मनयोजित होते. त्यामुळे मुद्दामच हे ‘हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ ही कविता निवडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाकडे ‘रावण’ या भूमिकेतूनच बघितलेले दिसते आणि अतिशय सावध राहून त्या संकटांचा मुकाबला केला. यासोबतच श्रीरामांनी वालीचा वध करून, किष्किंधेचे राज्य त्याचा भाऊ सुग्रीवाला दिले, तर रावणाचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले. कंस वधानंतर भगवान श्रीकृष्णांनी मथुरेचे राज्य त्याचे वडील उग्रसेन यांना दिले. ही दुसर्या राज्याप्रति व तेथील जनसमूहाप्रति व्यक्त केलेली व स्वीकारलेली भावना यावर आज आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
कर्नाटकातील मंगळुरू येथील ख्रिश्चन मिशनरी शाळेत जाणाऱ्या हिंदू मुलांवर सर्व प्रकारची बंधने लादण्यात आली होती. असा आरोप करण्यात आला आहे. त्यासोबतच, एका शिक्षकाने पंतप्रधान मोदींविरोधातील अपप्रचाराच्या गोष्टी सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या. या शिक्षकाने विपर्यास करून 'गोध्रा घटना' आणि 'बिल्कीस बानो प्रकरण' यासारखे संवेदनशील मुद्दे मुलांसमोर मांडले, त्यामुळे मुलांमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात द्वेष भरला.
विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात मंगळवारी उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद घेतली होती. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केली आहे. आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
जगात कुराण शरीफपेक्षा मोठा ग्रंथ नाही. त्यामुळे एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करावा, असे उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बर्क यांनी म्हटले आहे. शालेय अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याला विरोध करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
लवकरच शाळेत विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताचे धडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक शास्त्र समितीने ही शिफारस केली आहे. तसेच शाळेतील वर्गखोल्यांमध्ये भिंतीवर राज्यघटनेची प्रस्तावना लिहिण्याचीही शिफारस समितीकडून करण्यात आली आहे.
थोर महापुरुषांच्या शृंखलेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि योगेश्वर श्रीकृष्ण ही दोन नावे उच्चारली वा ऐकली की प्रत्येकाची मान श्रद्धेने झुकल्याशिवाय राहत नाही. या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाचे उद्दिष्ट समाज व राष्ट्राची नवनिर्मिती करून सर्वत्र मानवतेची दिव्य पताका फडकावणे हेच होते. या दोन्ही सत्पुरुषांनी आपापल्या युगात जे महत्तम कार्य केले आहे,ते युगानुयुगे समग्र मानवसमूहाला प्रेरणा देत राहील. आज गोपाळकाल्यानिमित्त ही कृष्णमहती...
राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांना रामायण महाभारतातील पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. त्यातूनच महानतेचा मानदंड महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज घडले. तात्पर्य, अनेक राजे, महाराजे, राष्ट्रपुरुष, यांच्या चारित्र्यातून नवीन सुसंस्कारीत पिढी घडविता येते. म्हणून संस्कारांचा महामेरू, बहुत जणांचा आधारू, निष्ठावान, वरदवंत, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र हा एक प्रेरणास्रोत आहे. २१व्या शतकातल्या ‘आत्मनिर्भर भारता’ला संस्कारी मानवधन हवे आहे. हे मानवधन निर्माण करण्यासाठी शिवचरित्रातून मला उमगलेले अष्टांग मा
शनिवार, दि. ६ मेच्या वैशाख ज्येष्ठ कृष्ण पक्षातील प्रतिपदेला आपण ’नारद जयंती’ साजरी केली. मुखी नित्य नारायणऽऽ नारायणऽऽ असा मंत्रोच्चार, नामसंकीर्तनात गढलेली आनंदमयी मुद्रा, वीणेचा टणत्कार, हातातील चिपळ्यांचा छुळछुळ-खळखळ असा नाद, गळी पुष्पमाला असे नारदमुनी नुसते मनात जरी आले तरी आपले चित्त नकळत प्रसन्न होत असतं, अशा नारदाची महती या निमित्ताने नारदपूराणाच्या वाङ्मयभांडारातले मोजकेच पैलू बघत या लेखात आपण वर्णूया.
जैवविविधतेचे संवर्धन हा हवामान बदलावर मात करण्याच्या उत्तम उपायांपैकी एक असल्याचे दिवसेंदिवस स्पष्ट होऊ लागले आहे. जैविक समुदायांचा आपापल्या पर्यावरणाशी जटील संबंध असल्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन ही गुंतागुंतीची प्रक्रिया ठरते. त्यातील आव्हानांवर एक उपायकारक योजना ही कळीच्या प्रजाती ओळखून त्यांच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करणे, ही आहे. अशी कळीची प्रजाती असलेल्या ‘भारतातील आशियाई हत्ती (एलिफस मॅक्सिमस) चे संवर्धन’ या विषयाचा थोडक्यात आढावा.
दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे
धन्यकाम होऊन पांडव मेले असे समजून अश्वत्थामा परत फिरला. परंतु, पांडवीवृत्तीचे अजून काम बाकी होते. त्यांना हस्तिनापूर राज्यावर पुन्हा अधिष्ठित व्हायचे होते. महाभारत संपायचे होते
कुंतीला सूर्यापासून झालेला पहिला मुलगा व पांडवांचा सर्वात मोठा भाऊ म्हणजे कर्ण. कथेनुसार पंडू प्रजननात अकार्यक्षम असल्यामुळे कुंतीला दुर्वासांपासून मिळालेल्या वरामुळे तिने कुमारी असतानाच त्या वरमंत्राचा प्रयोग करून पाहिला. कुमारी कुंती गरोदर राहून तिला कर्ण अपत्य झाले. कुंतीने कर्णाला गुपचूप गंगेत सोडणे भाग होते. कारण, जग काय म्हणणार? कुमारी मातेला मुलगा झाला!
कौरवांचे पहिले सेनापती भीष्मच होत. दहा दिवसांपर्यंत ते सेनानी म्हणून राहिले आणि दहाव्या दिवशी शिखंडीची आड घेऊन अर्जुनाने त्यांना शरबद्ध केले. दशेंद्रियांशी युद्ध म्हणजे भीष्मांचे कौरवांकडे दहा दिवसांपर्यंत सेनापतीपद सांभाळणे होय.
गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही केले जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. तेव्हा आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु परंपरेचे स्मरण करुया...
कृष्णाला आता अर्जुनाचा सारथी बनून हे महाभारत जिंकायचे आहे. कर्मसिद्धांताचा संकेत घेऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शपथ ग्रहण केली आणि अगदी त्याच क्षणापासून कामाला लागले. स्वार्थाच्या आजच्या जगात जिथे पद आणि प्रतिष्ठेसाठी काहीही घडते, तिथे देवेंद्र फडणवीसांसारखा नेता त्याग आणि पक्षादेश याचा वस्तुपाठ घालून देतो.
वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री व्रत. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणार्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या व्रतासाठी नेमके वडाचेच झाड का निवडले जाते? वडाचे झाड आपल्या अनंत पारंब्या घेऊन वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञ असते. या वडाच्या झाडाची महती सांगणारा हा लेख...
चंद्रप्रकाश द्विवेदी हे या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांपैकी एक आहेत. या चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ९० च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या चाणक्य या मालिकेचे ते दिग्दर्शक आहेत. चाणक्याची भूमिकाही त्यांनी केली होती. चाणक्याला देशात घरोघरी नेण्याचे काम त्यांच्या पात्राने केले.
कट्टरपंथी मुस्लिमांना सूर्याला ईश्वर मानायचे नसेल तर तेही ठीक, पण ते १२ आसनांचा व्यायाम तर करु शकतातच ना? की सूर्यनमस्कारासारखी व्यायामाची सर्वंकष पद्धती हिंदूंनी शोधल्याने ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ त्यालाही विरोधच करत राहणार? पण, खरे म्हणजे सूर्यनमस्कारातील १२ आसने वैश्विक व्यायाम प्रकार आहे, त्याचा धार्मिक आधारावर विरोध होऊच शकत नाही.
पवित्र ‘श्रीमद् भगवद्गीते'चे तत्वज्ञान हे शाश्वत आणि नित्यनूतन असून गीतेचा अनुवाद जगातील अनेक भाषांमध्ये करण्यात आला. त्यामुळे गीतेची थोरवी निर्विवाद आहेच. म्हणूनच आजच्या ‘गीता जयंती'च्या दिवसाला ‘विश्व ग्रंथ दिन' म्हणून मान्यता मिळण्याच्या दृष्टीने ‘ग्रंथालय भारती' ही संस्थादेखील प्रयत्नशील आहे. तेव्हा, आजच्या ‘गीता जयंती'च्या निमित्ताने गीतामहात्म्य आणि ‘विश्व ग्रंथ दिना'ची संकल्पना अधोरेखित करणारा हा लेख...
जय भगवान बिरसा मुंडा आपला भारत हा विभिन्न प्रांत, भाषा, संस्कृती यांनी समृद्ध आहे. देशात ३०० जनजातींचे वास्तव्य आहे, त्यातील अनेक वीरांचे आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे. त्यातीलच एक स्वर्णलंकारित नाव म्हणजे बिरसा मुंडा. सहजपणे, उत्स्फूर्तपणे जनजाती बांधवांनी त्यांना मोठ्या प्रेमाने ‘भगवान’ ही उपाधी बहाल केली. ‘जनजाती गौरव सप्ताहा’ निमित्ताने क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्याविषयी...
मुस्लीमबहुल इंडोनेशियातील सुकमावातींचे स्वगृही परतणे म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट साध्य करणे; जणू समस्त हिंदू धर्माने अधर्माविरुद्ध घेतलेली गरुडझेपच. म्हणून भारतीय चश्म्यातून पाहता तसेच हिंदू धर्मीयांचे भारतातील संख्याबळ (आणि त्यायोगे प्राप्त होणारे जागतिक वलय) लक्षात घेता सदर घटना एकूण हिंदू जगताच्या दृष्टीने मोठीच आहे.
होय, या लेखाचा मथळा अगदी योग्य आहे. कारण, ज्या आधुनिक महर्षीने हे दर्शन घडविले, त्यांना खरंच ‘महर्षी’ म्हणावे लागेल. कारण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे मराठी संत परंपरेतील, तसेच विद्ववत परंपरेतील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अनंत महाराज आठवले. त्यासोबतच अनेक ग्रंथांचे लिखाण व या लिखाणाद्वारे ‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या उक्तीनुसार सनातन हिंदू धर्म, हिंदुत्व वेगळे नाही हे पुराव्यासहित ठामपणे प्रतिपादित करणारे प्राचार्य अ. दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या समारा
एखादी गोष्ट परत परत केली तर तिचा कंटाळा येतो. सिनेमा पाहणे असो, पुस्तक वाचणे असो, फिरावयास जाणे असो, खेळणे असो किंवा इतर काहीही असो, ती गोष्ट परत करावयास कंटाळा येतो. मात्र, रामायण-महाभारत हे असे काव्य आहे, जे परत परत वाचावेसे वाटते. परत वाचताना त्यात एक नवाच अर्थ मिळत राहतो.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आली अभिनेत्री रिया चक्रवर्ती
जादा झालेल्या गव्यांची शिकार करायला शिकारी लोकांना अधिकृतपणे परवानगी द्यायचं ठरलं. मग संबंधित सरकारी खात्याने चक्क जाहिरात दिली की, शिकारीचे सर्व नियम पाळून, ज्यांना शिकार करायची आहे त्यांनी अर्ज करा.
अभिनेता अमीर खानने ५ ते ६ वर्ष 'महाभारत'वर भव्य चित्रपट बनवू इच्छित होता, मात्र आता त्याने या प्रकल्प थांबवला असल्याचे सांगितले
मागच्या दोन लेखांपासून आपण 'खगोलशास्त्र' (Astronomy) ही ज्ञानशाखा आर्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत काय सांगते, याचा एक धावता आढावा घेत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी केलेले संशोधन आपण पाहिले. त्यातून वेदांचा काळ त्यांनी इ. स. पूर्व ६००० पासून अजून मागे, तर महाभारत युद्धाचा काळ इ. स. पूर्व ५००० पासून अजून मागे नेऊन ठेवला. वैदिक कालखंड हा अतिशय प्रदीर्घ कालखंड आहे.
ब्रह्म सदासर्वकाळ सर्व ठिकाणी असतेच असते. त्याच्याशिवाय रिकामी जागा दाखवता येत नाही, पण त्याला वेगळेपणाने पाहायला गेले तर ते दुरावते. त्याचा संबंध सुटतो. दृश्यजगातील वस्तू जाणून घेण्यासाठी जे उपाय आपण करीत असतो, ते उपाय अद्वैत परब्रह्म जाणण्यासाठी केले, तर ते येथे अपायकारक ठरतात. अशी ही ब्रह्मज्ञान प्राप्तीची तर्हा अजब आहे.
निलेश नीलकंठ ओक यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि ‘The Historic Rama - Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.
औषधे घेण्यासाठी देखील पैसे नाहीत; वृद्धाश्रमातून मागितली मदत
रामायण आणि महाभारत या दोन ‘आर्ष (ऋषींनी रचलेले) महाकाव्यांत’ आर्य शब्द सद्गुणांचा वाचक म्हणूनच वापरला गेल्याचे मागच्या लेखात आपण पाहिले. आता पुढच्या उत्तरकालीन लौकिक संस्कृत / प्राकृत साहित्यात सुद्धा ‘आर्य’ शब्द कुठे आढळतो का, असल्यास कोणत्या अर्थाने येतो, याचाही असाच एक धावता आढावा घेऊ.
‘आर्य’ शब्दाच्या अर्थाच्या विविध छटा मागच्या लेखात आपण पाहिल्या. तसेच आर्य आणि दस्यु या शब्दप्रयोगांचे वैदिक साहित्यातले काही दाखले सुद्धा आपण पाहिले. ही उद्धरणे प्रत्यक्ष वैदिक संहितेतली असल्यामुळे सर्वात प्राचीन झाली. परंतु पुढच्या उत्तरकालीन संस्कृत साहित्यात सुद्धा ‘आर्य’ शब्द कुठे आढळतो का, असल्यास कोणत्या अर्थाने येतो, याचा आता एक धावता आढावा घेऊ.
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षत घेता देशात लॉकडाऊन दरम्यान सरकारने रामानंद सागर यांची रामायण ही मालिका दूरदर्शनवर पुनर्प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रसारणाच्या काही दिवसातच रामायण या मालिकेने जागतिक विक्रम केला आहे.
युधिष्ठिराची नजर सर्वांवरून फिरत होती. कारण, तो आपल्या भावांना शोधत होता. एवढ्यात त्याला दुर्योधन तिथे दिसला. तो रत्नजडीत आसनावर ऐटीत बसलेला पाहून युधिष्ठिराला आश्चर्याचा धक्का बसला.
श्रीकृष्णासारखा सखा सोडून गेला म्हणून अर्जुन खूपच दुःखी झाला होता. एकामागून एक वाईट घटना घडल्यामुळे त्याच्या मनावर भयंकर ताण आला. तो हस्तिनापुरात कसाबसा पोहोचला व बेशुद्धच पडला. त्याच्या मुखावर सुगंधी पाणी शिंपडल्यावर तो शुद्धीवर आला. त्याने सर्वांना बलराम, सात्यकी व श्रीकृष्ण यांचे देहावसान झाल्याचे सांगितले. समुद्राने त्यानंतर द्वारका कशी गिळली तेही कथन केले. दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आपले गांडीव धनुष्य निष्प्रभ झाले हेही सांगितले. आता जगण्याला काहीच अर्थ उरला नाही, असे सर्व पांडवांचे एकमत झाले.
प्रसार भारतीच्या शशी शेखर यांनी ट्विट करत दिले संकेत!
बाण घुसल्यामुळे श्रीकृष्णाला तीव्र वेदना झाल्या. व्याध धावतच त्याच्याजवळ गेला. तिथे हरीण नसून एक दिव्य पुरुष पिवळ्या रंगाची रेशमी वस्त्रे परिधान करून झोपला आहे हे पाहून त्याला धक्काच बसला. श्रीकृष्ण कण्हत होते. त्यांनी व्याधाकडे पाहत स्मित केले व म्हणाले, “हे व्याधा, तू माझ्यावर तो बाण सोडून उपकारच केले आहेस. माझ्यासमोर मरावे कसे, हा प्रश्न होता. तो तू अनायसे सोडवला व मला उपकृत केले. तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या घरी शांतपणे जा. या तुझ्या सुकृत्याबद्दल मी वर देतो की, तुला स्वर्गाची प्राप्ती होईल.” त
अखेरीस भीष्मांना देहातून मुक्ती देणारा दिवस उगवला! त्यांच्या दर्शनासाठी फुले, धूप, रत्ने, फळे, रेशीम वस्त्रे इत्यादी शुभ वस्तू घेऊन कृष्ण आणि पांडव परिवार कुरुक्षेत्री आला. त्यांच्या समवेत धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, द्रौपदी, सात्यकी, विदुर व युयुत्सु पण होते. शरशय्येवरती भीष्म आपली सुटका होण्याच्या प्रतीक्षेत होते.
ज्याच्यावरती डोळे मिटून विश्वास ठेवता येईल, अशा व्यक्तीला राजाने न्यायाधीश म्हणून नेमावे. ज्या राज्यात योग्य न्याय केला जातो, त्या राज्याचा पाया भक्कम असतो. राजा हा काळ घडवतो. काळ राजाला घडवत नसतो. जे राज्य सदाचरणाच्या पायावर उभे असते, त्याच राज्यात शांती असते.
खरे धार्मिक विधी पुरे होईपर्यंत बराच कालावधी निघून गेला. पांडव एक महिनाभर गंगातीरी तात्पुरती घरं बांधून राहिले. युधिष्ठिर तर खूपच शोकमग्न अवस्थेत होता. नारदमुनींनी त्याला आठवण करून दिली की, "युधिष्ठिर, तू आता या जगाचा सार्वभौम राजा झाला आहेस! तुझे अभिनंदन करण्याची आम्हाला संधी दे." परंतु, युधिष्ठिर पुन्हा पुन्हा दु:खात बुडत होता.
राधेयाचे सारे पुत्र मारले गेले होते म्हणून त्याचे और्ध्वदेहिक करायला कुणीच नव्हते. कुंती आता गंगाकिनारी होती. तिला तो दिवस आठवला, ज्या दिवशी तिने तान्हुल्या पुत्राला, सूर्यपुत्राला एका छोट्या लाकडी पेटीमध्ये ठेवून गंगेत सोडले होते. तो तेव्हाही अनाथ व पोरका झाला होता व आताही पोरकाच राहिला, याचे दुःख तिला झाले.
अर्जुनाने एका निमिषार्धात ब्रह्मशीर्ष अस्त्र मंत्रोच्चार करून अश्वत्थाम्यावर सोडले. आता आकाशात दोन दोन ब्रह्मशीर्ष अस्त्रे दिसत होती. दोन ज्वाळा संहार करण्यासाठी उफाळल्या. त्या दोन अस्त्रांच्या शक्तीमुळे नद्या व सागर कोरडे पडू लागले. सर्व जग थरथर कापू लागले.
सूडाच्या आनंदात हे तिघेजण बेभान झाले. सर्वांची कत्तल करून ते रणांगणामध्ये जिथे दुर्योधन कण्हत पडला होता तिथे आले. दुर्योधन जखमांनी विव्हळत होता. त्याच्या बाजूलाच त्याची गदापण पडली होती. प्राण कंठाशी येऊन तो अंगावर येणार्या श्वापदांना रात्रीच्या अंधारात हाकलत होता. हे तिथे मित्र त्याच्या जवळ पोहोचले. त्यांनी आपला पराक्रम दुर्योधनाला सांगितला.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ‘एएसआय’ने असे काही प्रकल्प हाती घेतले. १९५५ मध्ये बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापूर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इ. स. पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या.
युधिष्ठिराचे आणि दुर्योधनाचे संभाषण श्रीकृष्ण शांतपणे बघत होता. युधिष्ठिराने दुर्योधनालादिलेले आव्हान त्याला समजले. तो युधिष्ठिराकडे गेला आणि म्हणाला, "तू दुर्योधनाला कोणाशीही लढ असे कसे सांगिलेस? हा शुद्ध वेडेपणा आहे. मला तर असं वाटतं आहे की, माझ्या आयुष्यात मला भेटलेला सर्वात मूर्ख माणूस तूच आहेस. तू त्याला कुणाशीही द्वंद्वयुद्ध करायची परवानगी कशी दिलीस? तुझी ही उदारता, दया, धर्म, तुझ्या द्युताच्या खेळाची पुनरावृत्तीच वाटते. भीम जरी दुर्योधनापेक्षा अधिक बलदंड असला, तरी त्याला दुर्योधनाइतका सराव व कौशल्य न
"तुला एकदा आम्ही सामोपचाराने विचारलं होतं की, आम्हाला पाच गावं दे. आपण हे शांततेने मिटवून टाकू. पण, तुला तेव्हा दुराभिमान होता. तू निरोप धाडलास की, सुईच्या अग्रावर राहील एवढीही जमीन मी पांडवांना देणार नाही आणि आता तुला एवढं शहाणपण, हे औदार्य कसं सुचलं? तुझं मन थार्यावर आहे का? आता तर तुला लढूनच संपलं पाहिजे! इतकं सगळं घडल्यावर तुला मी जीवंत सोडू कसा! बाहेर ये व युद्धाला तयार हो!"