जेव्हा समाज आत्मविस्मृत होतो, तेव्हा त्या समाजात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात. आपसात स्वार्थभाव निर्माण होऊन कलह होतो आणि या परिस्थितीचा परकीयांनाच लाभ होतो आणि सर्वसामान्य रयतेचे जगणे कठीण होत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने सुलतान आणि परकीय सत्तांशी संघर्ष करत भारताच्या इतिहासात प्रदीर्घ काळाने हिंदूपदपातशाहीचे स्वतंत्र सिंहासन निर्माण केले. हिंदू समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. ‘दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा’ अर्थात दिल्लीचा बादशाह हाच ईश्वर ही मानसिकता धुळीला मिळवली.
Read More