गुरुवार, दि. ९ मार्च रोजी महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकारचा महत्त्वाकांक्षी अर्थसंकल्प विधानसभेत सादर झाला. राज्यात सत्तापालट झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असल्याने महाराष्ट्राच्या जनतेच्या या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या. या वर्षी राज्याच्या आर्थिक वाढीचा दर ६.८ टक्के एवढा अपेक्षित आहे. राज्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, बेरोजगारी आणि महागाई या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या सरकारने ठोस पावले उचलायला हवीत, ही अपेक्षा होती. ती काही अंशी पूर्ण झाल्याचे दिसून येते.
Read More