धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांतील संबंध म्हणावे तितके मधुर नाही. यासाठी नेपाळचा चीनकडे असलेला कल कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. परंतु, आता ही स्थिती बदलतेय. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड उच्चस्तरिय शिष्टमंडळासह नुकतेच चार दिवसीय भारत दौर्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. यात दोन्ही देशांतील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
Read More
भारताने भारत-नेपाळ सीमा सील केल्यापासून भारतामध्ये येणारे हजारो नेपाळी नागरिक हे धरचुला या सीमेवरती असलेल्या गावामध्ये अडकलेले आहेत. एवढेच नव्हे, तर नेपाळच्या मीडिया रिपोर्टप्रमाणे अनेक कोरोनाग्रस्त चिनी नागरिक आपल्या कामाच्या जागेपासून गायब झाले आहेत. तो एक मोठा धोका आहे आणि त्यांना शोधणे गरजेचे आहे. चीन भूसीमांच्या काही ठिकाणांवर नेपाळ सरकारने वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहे. जे अर्थातच पुरेसे नाही.