भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत मागच्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २८ दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दहशतवादाच्या आव्हानाशी संबंधित प्रश्नांना उत्तर देताना दिली. ते म्हणाले की, या चकमकीत आमच्या जवानांचेही बलिदान झाले ही खेदाची बाब आहे. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या तुलनेत मृत सैनिकांची संख्या खूपच कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
Read More