पाण्याच्या तीव्र टंचाईने जगभरातील देश चिंतेत आहेत. कधीकाळी भूभागासाठी युद्धे होत. पुढे तेलसाठ्यांसाठी युद्धे झाली. पण, येणाऱ्या काळात पाण्याच्या साठ्यांसाठी युद्धे होतील, असे भयानक चित्र सध्या दिसते. या पार्श्वभूमीवर हिमालय पर्वतशिखरांवरील बर्फाच्छादित आवरणाचे महत्त्व फार आहे. कारण, पर्वतराजींवरील हे बर्फाच्छादित आवरण, ज्याला ‘ग्लेशियर’ म्हटले जाते, ते ग्लेशियर माणसाला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे साधन आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे, प्रदूषणामुळे या ग्लेशियर्सचे विघटन होत आहे. ते वितळत आहेत.
Read More