जिथे राम नाही त्या ठिकाणी काम, आसक्ती, स्वार्थ, अहंकार हे विकार राहायला येतात. अशा कामकारी विकारी माणसाला भगवंताविषयी आदर, प्रेम, भक्ती वाटणे सुतराम शक्य नाही. असे स्वामींनी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितले आहे. कामविकार आलेल्या मनात राम राहत नाही. त्यामुळे ते मन प्रसन्न, आनंदी राहत नाही.
Read More