या तीन दिवसीय उपक्रमाची चर्चा दीर्घकाळ चालू राहील. संघाच्यादृष्टीने विचार केला, तर समाजातील सर्व स्तरांना जवळ करण्याच्या दृष्टीने संघाने टाकलेले हे फार मोठे पाऊल आहे. संघाच्या पारंपरिक टीकाकारांना आणि त्यातीलही प्रामाणिक टीकाकारांना विलक्षण धक्के देणारे विषय मोहनजींच्या भाषणातून आलेले आहेत. अज्ञान, भ्रम, कलुषित बुद्धी आणि स्वार्थ यांच्या प्रभावाखाली येऊन संघाचे टीकाकार झालेल्या लोकांना खूप काही नवीन देण्याचा विषय या तीन दिवसाच्या कार्यक्रमातून झाला.
Read More
संघ जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, संघ आरक्षणविरोधी आहे, संघ घटना मानत नाही, संघ मुस्लीमविरोधी आहे, संघ तिरंगा-राष्ट्रध्वजाला मानत नाही, संघ हिंसेचे समर्थन करतो, या सगळ्याच आरोपांबाबत आपली भूमिका ठामपणे सर्वांसमोर ठेवली. संघविरोधकांनी पसरवलेल्या या सर्वच गोष्टींवरील काजळी सरसंघचालकांच्या विचारांतून हटली आणि संघसत्याचा प्रकाश लखलखला.