नवी दिल्ली (India Pakistan Naval Collision) : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रातून मोठी घटना घडली. भारतीय नौदलाच्या एका युनिटची पाकिस्तानी नौदलाच्या युनिटशी समुद्रात धडक झाल्याची घटना घडली आहे.मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास उत्तर अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय पाण्यात ही घटना घडल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानकडे अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवला आहे.
नेमकं काय घडलं?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे एक युनिट आणि पाकिस्तानी नौदलाचे एक युनिट यांच्यात समुद्रात धडक झाली. ही घटना आंतरराष्ट्रीय पाण्यात घडली. या घटनेत मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली नाही. (India Pakistan Naval Collision)
मात्र, दोन्ही देशांमधील संवेदनशील संबंध पाहता या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारताचा तीव्र निषेध!
घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलावून भारताचा तीव्र निषेध नोंदवला. भारताने पाकिस्तानी नौदलाच्या संबंधित हालचालींवर आक्षेप घेत हे वर्तन “अस्वीकार्य आणि गैरव्यावसायिक” असल्याचे म्हटले आहे. (India Pakistan Naval Collision)
भारताने इस्लामाबादमधील आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांनाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे भारताचा निषेध नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
१९९१ च्या कराराचा भारताकडून हवाला
या प्रकरणात भारताने एप्रिल १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या द्विपक्षीय करारातील कलम १० चा उल्लेख केला आहे. लष्करी हालचाली आणि संबंधित बाबींमध्ये दोन्ही देशांनी आवश्यक ती खबरदारी आणि करारातील तरतुदींचे पालन करणे अपेक्षित असल्याची भारताची भूमिका आहे. (India Pakistan Naval Collision)
भारताने या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित आंतरराष्ट्रीय सागरी नियम आणि द्विपक्षीय करारांचे पालन करण्यावर भर दिला आहे.
या धडकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नसली, तरी भारत-पाकिस्तानसारख्या संवेदनशील संबंध असलेल्या दोन देशांच्या नौदल युनिट्सची समुद्रात झालेली धडक ही सुरक्षा आणि राजनैतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना मानली जात आहे. (India Pakistan Naval Collision)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.