मुंबई : (Prime Minister Peak Insurance Scheme) राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणांमुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलै वरून दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील आठ कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार कोकण विभागातून सुमारे १ लाख २ हजार ३३५, नाशिक विभागातून ३ लाख ३३ हजार ३८५, पुणे विभागातून ६ लाख ७ हजार ६६३, कोल्हापूर विभागातून २ लाख ४० हजार २५३, छत्रपती संभाजीनगर विभागातून १३ लाख २५ हजार, लातूर विभागातून २ लाख ४२ हजार ८२६, अमरावती विभागातून ६ लाख ९१ हजार ९७३ आणि नागपूर विभागातून ४ लाख ५३ हजार ३८३ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. एकूण ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, मराठवाडा विभागातून सर्वाधिक तर कोकण विभागातून सर्वात कमी प्रतिसाद मिळाल्याचे या आकडेवारी दिसून येते. (Prime Minister Peak Insurance Scheme)
पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत दि. १० ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करावे किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. (Prime Minister Peak Insurance Scheme)
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची ठाम भूमिका आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता १० ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा. कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून, सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ अर्ज करावा," असे त्यांनी केले. (Prime Minister Peak Insurance Scheme)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....