फाऊंटन ते गायमुख घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीला गती द्या; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना

Mira Bhayandar News
 
मुंबई : (Mira Bhayandar News) मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील गायमुख ते फाऊंटन या घोडबंदर मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
 
“घोडबंदर रस्ता हा मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांसह मुंबई-ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी निश्चित करून समन्वयाने दुरुस्तीची काम करावी आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा,” असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
 
या बैठकीला मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा, नगरविकास विभागाचे उपसचिव, शहर अभियंता, सहाय्यक संचालक, नगररचना तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या दुरुस्तीची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, संबंधित यंत्रणांची जबाबदारी तसेच कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
 
“नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि सुरळीत रस्ता उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. विविध विभागांमधील समन्वयाअभावी कोणतेही काम रखडता कामा नये. घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आवश्यक निर्णय तातडीने घेतले जातील,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर