मुंबईत परळ-लालबागमध्ये ईदच्या रात्री धर्मांधांनी केलेली हुल्लडबाजी आणि त्याला हिंदूंनी दिलेले सडेतोड प्रत्युत्तर, हा एका रात्रीपुरताच मर्यादित संघर्ष नाही; तर लोकसंख्येच्या जिहादचे जे आकडे नुकतेच समोर आले आहेत, त्याचे हे जमिनीवरील स्फोटक वास्तव आहे. त्यामुळे यापुढे ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’ हा हिंदूंनी दिलेला इशारा या हुल्लडबाजांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी कायमचा लक्षात ठेवावा.
मुंबईत परळ आणि लालबागचा परिसर हा हिंदू संस्कृतीचे, सण-उत्सवांचे आणि कट्टर मराठीबाण्याचे एक धगधगते केंद्र. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेपर्यंत या भागाने नेहमीच हिंदुत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची ज्योत तेवत ठेवली. बुधवारी रात्री याच हिंदूबहुल आणि शांतताप्रिय परिसरात ईद साजरी करण्याच्या नावाखाली शेकडो धर्मांध मुस्लिमांच्या टोळयांनी जाणीवपूर्वक घुसखोरी करून जो थिल्लर शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न केला, तो अत्यंत संतापजनक आणि तितकाच चिंताजनक. दुचाकींवरून तिघे-तिघे बसून, वाहतुकीचे सर्व नियम पायदळी तुडवत आणि हातात हिरवे झेंडे फडकावत या हुल्लडबाजांनी आक्रमक घोषणा देत संपूर्ण परिसराला वेठीस धरले. फुटपाथवरून गाड्या चालवणे, हिंदू तरुणांना पाहताच त्यांना जाणीवपूर्वक डिवचण्यासाठी जोरजोरात ओरडणे आणि तिथल्या गणेशोत्सव मंडळाला व गणेशमूर्तीला हानी पोहोचवण्याची थेट धमकी देणे, हा प्रकार म्हणजे सण साजरा करणे नक्कीच नव्हता, तर हिंदूंच्याच गल्लीत घुसून त्यांच्या मनात दहशत आणि भीती निर्माण करण्याचा हा एक सुनियोजित जिहादी प्रयोग होता.
मुस्लिमांकडून ईद किंवा मोहरमच्या निमित्ताने दरवर्षी मुद्दाम असे हिंसक शक्तिप्रदर्शन का केले जाते, हा प्रश्न आता प्रत्येक हिंदूने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. रस्त्यावर गोंधळ घालणे, रस्ते अडवणे, जीवघेणी स्टंटबाजी करणे आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास होईल असे वर्तन करणे, ही कुठला सण साजरा करण्याची पद्धत असू शकते? हे सगळे कशासाठी, तर आमची संख्या वाढली आहे आणि आम्ही काहीही करू शकतो, हे उघडपणे दाखवून देण्यासाठी केलेला हा अघोरी खटाटोपच! दै. ‘मुंबई तरुण भारत’ने कालच आकडेवारीसह ‘अधिवक्ता परिषदे’चा एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार, मुंबईतील १७ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लीम लोकसंख्या ३५ टक्क्यांवर पोहोचल्याचे निष्पन्न झाले. लोकसंख्येतील हा बदल म्हणजे, हिंदू समाजावर संथगतीने केला जाणारा विषप्रयोग आहे, हे या अहवालाने बजावून सांगितले आहे. पण, या अहवालाची शाई वाळायच्या आतच, परळमध्ये या वाढत्या लोकसंख्येचे आणि त्यांच्या वाढत्या मग्रुरीचे हे स्फोटक वास्तव समोर आले. पण, ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित धोयाची घंटा नाही, तर हा संपूर्ण हिंदू समाजासाठी मृत्युघंटा ठरू शकणारा स्पष्ट इशारा आहे.
हिंदू समाजही वर्षभर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती, दहीहंडी असे अनेक सण अत्यंत उत्साहात, शिस्तीत आणि भव्य प्रमाणात साजरा करतो. पण, त्यामध्ये इतर धर्मियांच्या भावना दुखावण्याचा, त्यांच्या वस्त्यांमध्ये घुसून त्यांना भडकावण्याचा अथवा कोणालाही खिजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कधीही केला जात नाही. हिंदू आपले सण आपापल्या परिसरात, शांततेने आणि नियमांच्या चौकटीत राहून साजरे करतात. हिंदू तरुणांची टोळकी मुस्लीम वस्तीत घुसून महिला-मुलींची छेड काढत नाहीत, त्यांच्या धर्माचा अथवा त्यांच्या प्रतीकांचा अपमान करीत नाहीत. कारण, ते हिंदूंचे संस्कार नाहीत आणि हिंदू धर्म अशा द्वेषाची शिकवणही देत नाही. मग परळ-लालबागसारख्या हिंदूबहुल भागांत, जिथे मुस्लिमांची वस्तीही नाही, तिथे या जिहाद्यांना घुसण्याची, दुचाकींवरून मुद्दाम फेर्या मारुन रस्त्यावर गोंधळ घालण्याची गरजच काय होती? त्यामुळे धर्मांधांच्या या कृत्यामागे केवळ आणि केवळ धार्मिक उन्माद आणि प्रक्षोभ निर्माण करण्याचीच कुटिल वृत्ती लपलेली आहे, हे आता सूर्यप्रकाशाइतकेच लख्ख झाले आहे.
काही दिवसांपूर्वी याच मुंबईत माझगाव येथील गणेश आगमन मिरवणुकीवर जाणीवपूर्वक अंडी फेकण्याचा निंदनीय आणि संतापजनक प्रकार घडला. पोलिसांनी ज्या धर्मांधाला अटक केली, त्याने निर्लज्जपणे कारण दिले की, मिरवणुकीत फटाके वाजवत होते म्हणून त्याला त्रास झाला आणि त्याने अंडे फेकले. मग आता त्याला किंवा त्याच्या पाठीराख्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की, भोंग्यांवरून दिवसातून पाचवेळा जो आवाज येतो, तेव्हा हिंदूंनी कधी अशी अंडी फेकली आहेत का? मग ईदच्या मिरवणुकीतही मध्यरात्री फटाके वाजले, रस्त्यावर गदारोळ झाला, गाड्यांचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज काढले गेले, तेव्हा त्यांना तो त्रास कसा वाटला नाही? तेव्हा त्यांना अंडी फेकावीशी का वाटली नाहीत? हिंदू समाज शांतताप्रिय आणि सहिष्णू असल्यामुळेच या धर्मांधांमुळे झालेला त्रास निमूटपणे सहन करतो आणि बदल्यात अंडी किंवा दगड फेकत नाही. याचा अर्थ, हिंदूंच्या सहिष्णुतेला त्यांची हतबलता समजण्याची चूक कुणीही करू नये!
मागे मिरा रोडमध्येही एका निवासी संकुलात, जिथे शाकाहारी कुटुंबे राहतात, तिथे मुद्दाम बकरे आणून त्यांची कत्तल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला होता. तेव्हाही हिंदूंनी असाच प्रखर आणि संघटित विरोध केला आणि प्रशासनाला तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले. आता तिथे तसा नियमही लागू झाला आहे. पण, हिंदू शांत आहे, संयमी आहे, याचा अर्थ तो घाबरलेला किंवा कमकुवत नक्कीच नाही. हे काल परळ-लालबागच्या जागरूक आणि बाणेदार हिंदूंनी पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला आणि देशाला दाखवून दिले. या हुल्लडबाजांनी मर्यादा ओलांडली आणि गणेश मंडळाला धमया देण्यापर्यंत त्यांची मजल गेली, तेव्हा तिथल्या हिंदूंनी त्यांना त्याच भाषेत सडेतोड आणि घणाघाती प्रत्युत्तर दिले. ‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’ हा जो धडा परळच्या हिंदूंनी या धर्मांधांना तिथेच शिकवला, तो खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे.
सण-उत्सव साजरे करण्याबरोबरच अशा जिहाद्यांच्या टोळयांना वेळीच आणि त्यांच्याच भाषेत धडा शिकवणे आता अपरिहार्य. हिंदूंच्या सणाला किंवा उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर तो यापुढे कदापि सहन केला जाणार नाही, याचा थेट प्रत्यय परळच्या घटनेने दिलाच.
पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या गदारोळ घालणार्यांना अटकही केली, हेही तितकेच महत्त्वाचे. हुल्लडबाजांनी आणि त्यांना फूस लावणार्या राजकीय नेत्यांनी हे पक्के ध्यानात ठेवावे की, आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत आहे. केवळ मुंबईच नाही, तर देशभरात आज हेच चित्र दिसत आहे. लोकसंख्येच्या जिहादातून हिंदूंच्या अस्तित्वाला नख लावण्याचे कुटिल कारस्थान सुरू आहे. मात्र, हिंदूंना कुणीही कमी लेखण्याची किंवा गृहीत धरण्याची चूक करू नये. हिंदू संयमी आहे, अहिंसेवर विश्वास ठेवणारा आहे, याचा अर्थ त्याचे हात बांधलेले आहेत, असे समजून त्यांना कमजोर समजू नका, अन्यथा जो धडा परळमध्ये मिळाला, तो प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक चौकात मिळाल्याशिवाय राहणार नाही. या हुल्लडबाजांना आणि त्यांच्या मागच्या सडया मेंदूंना कायद्याच्या चौकटीत राहून आणि वेळ आल्यास रस्त्यावर उतरूनही ठोकून काढाच, हाच या प्रवृत्तींवर प्रभावी आणि जालीम उपाय!