...म्हणून डावा विचार इथे रुजत नाही!भांडवलशाहीचे समर्थन अमेरिका, युरोपातही झाले. पण त्यांना त्यासाठी रक्त सांडावे लागले नाही. लोकांचे बळीही द्यावे लागले नाहीत. कम्युनिस्टांचा प्रभाव असलेल्या रशिया, चीनमध्ये मात्र रक्ताच्या चिरकांड्या उडवून औद्योगिक क्रांती मार्गस्थ झाली. इकडे मात्र, ..
श्रीकृष्णसुदामा असो, अर्जुन असो वा मग विदुर. श्रीकृष्ण मित्र म्हणून त्यांच्या समवेत राहिले ते स्ट्रक्चर, इर्ने्रंस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, या तीनही अंगाने. कुठेही, कशाचीही उणिव मागे न ठेवता, किंतु-परंतु न बाळगता, ठामपणे सोबतीने उभा राहणारा सखा म्हणजे ..
सुपर थर्टी!हा देश गरिबांचा म्हटला जातो. हा देश भिकार्यांचा, अल्पशा मेहनतान्यावर काम करणार्या मजुरांचा मानला जातो. मग व्हिसा, मास्टरकार्ड वापरणारी माणसं कोण आहेत? विमानं कुणासाठी आहेत? गुळगुळीत रस्ते कुणासाठी आहेत? कुणाच्या घामातून साकारला आहे हा झगमगाट?... ..
कॉंग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी....या पृष्ठभूमीवर, कॉंग्रेसाध्यक्षपद ‘गांधी’ घराण्याच्या बाहेर काढण्याचा दस्तुरखुद्द राहुल यांचा प्रस्ताव म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. तो केवळ विरोधकांनी केलेल्या धारदार टीकेचा परिणाम नाही. पक्षाची धुरा सांभाळणार्यांना एव्हाना लोकभावना ध्यानात ..
भिकार्यांच्या विश्वात...ही पोरं आयुष्यभर ‘अशीच’ जगणार असल्याच्या निराशाजनक निष्कर्षाप्रतही तो आलेला असतो एव्हाना. या लेकरांना पुढे करून स्वत:ची पोटं भरणारे मायबापही त्याला ठाऊक असतात अन् आपल्या ठेल्याभोवती जमलेल्या ग्राहकांपुढे स्वत:च्या लाचारीचे प्रदर्शन मांडून त्यांच्या ..
चीनच्या विरोधावर नाही, आक्षेप राहुलच्या बरळण्यावर आहे!युद्धाच्या प्रसंगात देश एकसंध असल्याचे सिद्ध करण्याचाच ध्यास असला पाहिजे प्रत्येकाचा. पण, इथे तर देशात दुफळी माजली असल्याचे चित्र निर्माण करण्याचीच अहमहमिका लागली आहे. तुम्हाला मोदी पंतप्रधान नको आहेत, भाजपा सत्तेत नकोय्, त्यासाठीच सारा जळफळाट ..
का नको युद्ध?तरी बरं, आश्रय घ्यायला लादेनलाही पाकिस्तानच गवसला होता या भूतलावर... तरीही ते शहाणे, त्यांचा दहशतवादाला पाठिंबा नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. भारतातले काही दीडशहाणेही विश्वास ठेवतात त्यांच्यावर. पाकिस्तानची ही तर्हा कुठवर सहन करायची, याचाच फक्त ..
व्हीआयपी संस्कृती अन् प्रोटोकॉलचे स्तोम!आता तर एक जिल्हाधिकारीही प्रोटोकॉलचे कारण पुढे करून, मोर्चातल्या लोकांना स्वत:च्या दालनात बोलावून ऐटीत निवेदन स्वीकारतो... खरंच जनता मालक आहे इथे? कोण नाही सांगा या व्हीआयपी यादीत? युपीएससीच्या सदस्यांपासून तर राज्याच्या अॅडव्होकेट जनरलपर्यंत झाडून ..
भान प्रजासत्ताकाचे आणि नागरिकांच्या कर्तव्याचेही...हे आहेत भारतीय नागरिकांकडून अपेक्षित असलेले कर्तव्य. सगळी मिळून अकरा मुद्यांची जंत्री आहे ही. कुठेही दबाव नाही, कायद्याचा धाक नाही. नाहीच बजावलं कुणी आपलं कर्तव्य, तरी कुणी फासावर लटकावणार नाही. पण... जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दुरभिमान ..
नेमके कुठे चाललो आहोत आपण? तिकडे सातासमुद्रापल्याडच्या लोकांनी अवकाशाच्या दिशेने घेतलेली झेप, हा आमच्यासाठी चुन्यासोबत चोळलेल्या तंबाखूच्या सोबतीने चघळण्याचा विषय असतो. यात गंमत शोधायची की दुर्दैव, एवढाच शिलकीचा प्रश्न आहे. पण हे मात्र खरंच की, विचारांच्या संदर्भातल्या श्रीमंतीचा ..
गरिबांची स्थिती सुधारतेय्...सरकारने चाळीस रुपयांचा तांदूळ दोन रुपयांत देऊन लोकप्रियता मिळवायची, की लोकांना चाळीस रुपयांचा तांदूळ विकत घेण्याइतके सक्षम बनवायचे, हा खरा प्रश्न आहे. बहुतांशी यातला सोपा पर्याय प्राधान्याने निवडला जातो. तो राजकारण्यांच्या सोयीचा असतोच, पण दुर्दैवाने ..
व्वा! विजय माल्या, व्वा!या बँकवाल्यानांही ना अशीच अद्दल घडवायला पाहिजे होती कुणीतरी. ज्यांनी मुळात कर्ज घेऊनच बँकेवर थोर उपकार केले आहेत, त्या तुमच्यासारख्या असामीकडून काय परतफेडीची अपेक्षा ठेवायची? देशात इतके सारे इतर लाचार, गरजवंत, गोरगरीब लोक शेकड्याने पडलेले असताना ..
तेरा वर्षांत बारा बदल्या झालेला अधिकारी!हे अधिकारी अतिशय कडक, नियमांवर बोट ठेवून वागणारे, पारदर्शक पद्धतीने काम करणारे असल्याची त्यांची ख्याती आहे. मग अडचण कुठे आहे? असे अधिकारी नकोत प्रशासनात? मग टिकत का नाही तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी एका ठिकाणी? ते एखाद्या ठिकाणी नुसते रुजू झालेत, ..
संसद आणि विधिमंडळे कमजोर होताहेत...लोकशाहीप्रक्रिया मजबूत करण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांचीही आहे. पण कुठे राजकीय पक्षांच्या, तर कुठे भांडवलदारांच्या चौकटीत अडकलेली माध्यमं ही जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. उलट, दिवसागणिक ती अधिकच उथळ आणि बेजबाबदारपणे वागत असल्याचे निराशाजनक चित्र ..
दुसर्यांनी का सोडवायचे आपले प्रश्न?सारंकाही सरकार करेल, याच भूमिकेतून तत्कालीन राज्यकर्त्यांनी लोकांची मानसिकता तयार केली. परिणाम असा की, इथे फक्त ‘मतदार’ तेवढे शिल्लक राहिले, जबाबदार ‘नागरिकांची’ मात्र वानवा झाली. दुर्दैव असे की, त्याचे कुणाला शल्यही नाही. नागरिक सर्वार्थाने जबाबदार ..
निमित्त अनुप जलोटांच्या लग्नाचे... शेवटी जलोटा हे केवळ एक गायक आहेत. ते काही साधुसंत नाहीत, हेही समजून घेतले पाहिजे. संतपदाला पोहोचलेल्या व्यक्तींना अवचित स्फुरलेल्या पंक्तीतून वाहणारी भक्तिधारा सुरांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लोकांपर्यंत पोहोचविल्यानंतरही, ईश्वरचरणी लीन होण्याची ..
दीडशहाणी स्वरा! तसे तर भीमा-कोरेगाव प्रकरणात आतापर्यंत निदान 10 जणांना अटक झाली आहे. पण, कालपर्यंत स्वराला कंठ फुटला नव्हता. सापाची शेपटी वळवळली ती सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्सॉल्वीस यांना पोलिसांनी हात लावल्यावर! मग आधीच्या पाच ..
बा! सिद्धू...! आपले पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या भेटीच्या वेळी तिथले जे अधिकारी सलामी द्यायला रांगेत उभे राहतात, त्यांना गळाभेटीसाठी पात्र ठरविण्याची किमया भारतीय संसदेचे सदस्य राहिलेल्या नवज्योत सिद्धू यांच्या हातून लीलया घडावी, ही बाब सार्या भारताला आक्षेपार्ह ..
सोनम वांगचूकजवळपास तीन दशकं होताहेत. वांगचूक यांनी आरंभलेल्या चळवळीला वेगही येतोय् आणि आकारही. सार्या जगाने दखल घेतली त्यांच्या कार्यकर्तृत्वाची. सॅनफ्रान्सिस्कोपासून तर युनेस्कोपर्यंतच्या संस्थांनी पुरस्कृत केले. या कालावधीतला एक प्रयोग मात्र सपशेल फसला- ..
मंदिरांचा कारभार चालवणे हे सरकारचे काम आहे का?सरकार राज्याचा कारभार चालवण्यासाठी निवडले गेले आहे की मंदिरांचा? मग सरकारवर अशी वेळ का यावी? निर्गुंतवणूक करत उद्योगजगतातून बाहेर पडणारे सरकार धार्मिक संस्थांच्या, त्यातही अपवादाने केवळ मंदिरांच्या कारभारात ढवळाढवळ करायला धजावत असेल, तर त्याचे समर्थन ..
एक धडपड... फुलपाखरांसाठीची...आपण चुकीच्या माणसाचे अपहरण केल्याची बाब स्पष्ट झाल्यावर त्यांनी बर्डेकरांना सोडून तर दिले, पण या त्यासाठी जवळपास अडीच-पावणेतीन महिन्यांचा कालावधी जावा लागला. तो थरार, ती घालमेल, ती अस्वस्थता, ‘संपलं सारं आता’ असं वाटणारे काही प्रसंग, कुठलेसे सकारात्मक ..
फसव्या जाहिरातींविरुद्धची लढाई... सुरू होईल कधी?खरंतर ही जाहिरात बघणारे, लाखो-करोडो लोक आहेत. त्यांच्या लक्षात नाही येत कधीच, की कुठलासा डिओड्रंट वापरला म्हणून कुणाच्या गळ्यात पडायला मुली एवढ्या मूर्ख नाहीयेत म्हणून? असे घडणे शक्य नाही हे आम्हाला कळते. ज्यानं जाहिरात केली त्यालाही याची जाणीव ..
नक्षलसमर्थकांच्या सत्यशोधनाची नौटंकी!पांढरपेशावर्गातील नक्षलसमर्थकांच्या विविधांगी क्लृप्त्यांचे आश्चर्य नाहीच. गेली कित्येक वर्षे हाच धंदा चाललाय् त्यांचा. तो नक्षली चळवळीच्या कार्यपद्धतीचाही एक भाग आहे. ..
पुरुषी अहंकार ठेचण्यासाठी...उपरोक्त प्रकरणातील एकूण एक माणसांचं वागणं म्हणजे निर्लज्जतेची हद्द अधोरेखित करणारं अन् माणुसकीला काळिमा फासणारं धगधगतं वास्तव आहे. एकुलता एक मुलगा साता समुद्रापल्याड दूर कुठेतरी इंग्लंड-अमेरिकेत राहतो म्हणून एकटेपण सोबतीला घेऊन जगणार्या आई-बापाची ..
मुजोर सलमानचे मूर्ख समर्थककीस पाडत, कायद्याचा वाट्टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. ..
मंत्रालयातली उंदरं!परवा, एकनाथराव खडसे यांनी एक प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले. खुद्द सत्ताधारी पक्षातले, खडसे यांच्यासारखे एक दमदार, अनुभवी, ज्येष्ठ नेतृत्व एखादे प्रकरण उघडकीस आणताहे म्हटल्यावर, त्याचे गांभीर्य दखलपात्र ठरणे ओघानेच आले. ..
लाज तर यांचीही वाटली पाहिजे ना सुप्रियाताई!सरकारी कार्यपद्धतीतील प्रचलित लालफीतशाहीला कंटाळून धर्मा पाटील नावाच्या एका शेतकऱ्याने मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या केल्याच्या पाश्र्वभूमीवर, सरकारची लाज काढण्याच्या प्रकाराबद्दल सुप्रियाताई सुळे यांचं खरंतर कौतुकच केलं पाहिजे. ..
न्यायव्यवस्थेचे वाभाडे!मुळात इथे मुद्दा हा आहे की, न्यायव्यवस्थेला लागलेल्या ज्या किडीचा, भ्रष्टाचाराच्या व्यवधानाचा उल्लेख राकेश कुमारांनी त्यांच्या निकालपत्रातून केलाय्, तो खोटा आहे की खरा? तो खरा असेल, तर मग केवळ व्यक्त होण्याच्या त्यांच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवून ..
ढिंग एक्सप्रेस!कधीकाळी शेतात धावणारी पोरगी आता आंतराष्ट्रीय स्पर्धेत खर्याखुर्या मैदानावर धावू लागली. सुरुवातीला अपयशाचा ससेमिरा काही सुटला नाही. तिही समर्थपणे त्याला तोंड देत राहिली- न डगमगता. यश पायाशी खेचून आणण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीनेच लढण्याचे बळ दिले. ..
कॉन्व्हेंट संस्कृतीतही शिक्षणाचे तीनतेराच!इंट्रो : आम्हाला बेळगाव, निपाणी, कारवारसह कर्नाटकातली 800 गावं महाराष्ट्रात हवीत. का, तर ती मराठी भाषक आहेत म्हणून. आणि इकडच्या गावात मात्र मराठी शाळा नकोत! मराठी बेळगावसाठी आम्ही अजूनही लढा लढणार. तो लढा लढताना प्राण गमावणार्या 105 जणांची यादी ..
साहेब, लावायचा का व्हिडीओ...?म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन् विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा.....
मराठी टिकेल कशी? नेत्यांनी त्यांच्या मुलांंना इंग्रजी शाळेत शिकवण्यावर आक्षेप नाहीच. आक्षेप, तरीही त्यांनी मराठीचा बेगडी दुरभिमान बाळगण्यावर आहे! आक्षेप, तरीही त्यांनी निलाजरेपणाने मराठीचे राजकारण करण्यावर आहे. त्यांच्या राजकारणाच्या या धामधुमीत, मराठी माध्यमांच्या ..
सोशल मीडियाचे व्यसन...एकूण, सोशल मीडियाच्या जगात इतरांच्या तुलनेत काहीतरी वेगळेच चालले आहे आपले. वैश्विक पातळीवर लोक त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग धुंडाळीत असताना, आपण भारतीय लोक मात्र त्यात खोलवर गुरफटत चाललो आहोत दिवसागणिक. यातून लोकांना बाहेर काढण्याची निकड त्यातूनच ..
इथे जीवनाच्या तुलनेत मृत्यू श्रेष्ठ आहे...!दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करणार्या, लष्करातल्या एका जवानाचे हे हाल दुर्दैवी नाहीत? मेट्रो म्हणजे फारच फार, दुरात दूर तासाभराचा प्रवास. तेवढा वेळ उभे राहिल्याने काही कुणी थकून जाणार नाही. पण, गाडीतील एकाही मर्दाने आपल्या जागेवरून उठून उभे राहात ..
बेरोजगारी शिगेला?स्वयंरोजगाराच्या संधी प्रत्येकाने स्वत:साठी निर्माण करण्याची गरजही महत्त्वाची आहे. सर्वांनी पकोडेच तळले पाहिजे, अशी कुणाचीच अपेक्षा नाही. तसे कुणी म्हटलेलेदेखील नाही. पण, इथे तर तोही एक व्यवसाय होऊ शकतो म्हटल्याबरोबर ‘पप्पू’ जमातीची अख्खी फौज उभी ..
नागरिकत्व विधेयकाविरुद्धचा पोटशूळ...अमेरिका असो वा मग भारत, जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या देशांना असा समंजसपणा दाखवावाच लागतो. मनाचा मोठेपणाही दाखवावा लागतो. गरजवंतांच्या मदतीला धावून जावे लागते. सोबतच, आपल्या देशाची धर्मशाळा होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागते. ..
हताश कॉंग्रेसचा तारणहार ‘कन्हैया!’मुद्दा सत्ताधार्यांनी भांडवलदारांसाठी सत्ता राबविण्याचा असो, की मग लोकशाहीव्यवस्थेने चालविलेल्या गरिबांच्या थट्टेचा, या वावटळीतून कॉंग्रेसला बाजूला कसे ठेवता येईल? हे कन्हैया कुमारांनाही कळत नसेल, केवळ भाजपाला विरोध करायचा म्हणून ते याच नाकर्त्या ..
चोराला हवी शाही बडदास्त!आपण कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे धारक असल्याने, इथली व्यवस्था काय नि कायदे काय, काहीच आपल्याला लागू होत नसल्याच्या निष्कर्षाप्रत विजय मल्ल्याने येणे वेगळे आणि दस्तुरखुद्द समाजाला त्याची ही मुजोरी मान्य असणे त्याहून वेगळे. ज्या वेळी समाजालाही, ..
राहुल गांधींचे मतलबी हिंदुत्व!हिंदूंचं काय मनावर घ्यायचं, ते तर मतं देतातच, सांभाळलं पाहिजे ते मुस्लिमांना. दखल घेतली पाहिजे ती अन्य अल्पसंख्यकांची. त्यांची मतं महत्त्वाची. ते नकोत नाराज व्हायला... अशा विचारांतून चाललेल्या यांच्या राजकारणाच्या तर्हेची जागृत हिंदू समाजाने मतदानाच्या ..
लिव्ह इन : परिणामही ज्यांचे त्यांनीच भोगावेत!प्रचलित सर्वमान्य लग्नपद्धती मोडीत काढून लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय स्वबळावर निवडण्याइतक्या स्वयंघोषित पुढारलेल्यांनी, त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. त्यांचे निर्णय घेताना ते समाजाला कवडीची किंमत देणार नाहीत, त्यांच्या ..
मी टू...भारतीय समूहाला स्त्रियांवरील अत्याचाराचे तसे अप्रूप नाहीच. अंगवळणी पडलेला आणि सर्वांनीच गृहीत धरलेला तो प्रकार असल्याने इथे त्याचे आश्चर्य नाहीच. खरंतर पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत संस्काराची भाषा आम्ही अधिक बोलतो. पण, एकमेकांच्या भावनांचा सन्मान ..
प्रश्न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले!कलम 377 असो की 497, ते पूर्णत: वा अंशत: खारीज केल्याबरोबर लागलीच दुसर्या दिवशीपासून अराजक निर्माण व्हायला, समाजात रुजलेले संस्कार आणि नैतिकतेचा पाया इतकाही तकलादू नाही. पण, तो दिवसागणिक ठिसूळ होतोय् हे मात्र खरं! भारतीयांना असलेले पाश्चिमात्य ..
लव्हरात्री...चित्रपट यायचाय् अजून बाजारात. पण, लागलीच दुखावल्या कुणाच्यातरी धार्मिक भावना. हो! चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी भावना दुखावल्या, तरच त्याला काही अर्थ ना! त्याशिवाय लोकभावनांचा भडका कसा उडेल? त्याशिवाय कुणी कोर्टात कसे जाईल? प्रकरण न्यायालयात दाखल ..
चमच्यांच्या गर्दीत हरवलेले अपात्र नेते!पण, करता काय? गांधी बरळले. मन मानेल तसं. असले काहीबाही बिनधास्तपणे बरळण्याचा परवाना घेऊनच जन्माला आलेत ते. त्यांना कोण काय म्हणणार? घराण्याचा वारसाच एवढा मोठा लाभलाय् त्यांना की, मी मी म्हणवणारी बडी बडी मंडळी बाजूला ठेवून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद ..
पंडित नेहरूंचा दलाई लामाकृत उद्धार...!बरं, कालपर्यंतची परिस्थिती अशी होती की, हिंदुत्ववादी, संघवाले म्हटलं की, रान मोकळे असायचे सर्वांना शिवीगाळ करायला. आता नेहरूंविरूद्ध ब्र काढायचा म्हटलं, तर लोक बिनदिक्कतपणे मोदीभक्त ठरवून टाकतात. त्यामुळे सत्य मांडले गेले तरी हवेत उडवला जायचा मुद्दा. ..
बुडत्या जहाजाचा कॅप्टन ठरणार इम्रान?अनेकानेक दिग्गजांना आश्चर्याचा धक्का देत, माजी क्रिकेटपटू इम्रान खान सत्तास्थपनेच्या दिशेने मार्गक्रमण करताहेत. हा, पाकिस्तानी जनतेच्या अनाकलनीय राजकीय आकलनाचा आणि त्यानुरूप केलेल्या प्रगल्भ वर्तणुकीचा परिणाम म्हणायचा, की, एकूणच अस्थिर राजकारणाचा ..
सामान्य माणसाची संशयास्पद लढाई...ही व्यक्ती रिक्षा चालवून जर एवढी गब्बर झाली असेल की, कोर्टातल्या वकिलाची फी तिने सहज अदा करावी... त्याला सवडही झाली असेल एवढी की, त्याने कचेरी आणि कोर्टाच्या चकरा विनासायास माराव्यात, तर मग या देशात आता केवळ धर्माची परिभाषा निश्चित करण्याचीच समस्या ..
बाळासाहेबांच्या नावाची शान राखा साहेब...एकदम मस्तच स्टाईल बरं साहेब ही आपल्या राजकारणाची! भल्या भल्यांना साधले नाही हे राजकीय चातुर्य. पण तुम्ही? कसे सहज आत्मसात केलेत बघा. मानलं साहेब आपल्याला. राजकारण करावं तर हे असं. सरकारमध्येही राहायचं अन् सरकारला ठोकूनही काढायचं. सत्ता मनमुराद ..
प्रणवदांच्या भाषणाचा मथितार्थ...पहिले तर लोकांना, त्यांनी संघाच्या कार्यक्रमात आलेलेच नको होते. पण, स्वत:च्या निर्णयावर ठाम राहात त्यांनी या कार्यक्रमातील उपस्थितीसाठी होकार दिला तर यांना लागलीच पोटशूळ उठला. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा म्हणून यांचा थयथयाट सुरू ..
आसाराम प्रकरणातील जनतेच्या प्रगल्भतेचा प्रत्ययतिकडे न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. आसारामला दोन जन्मठेप सुनावल्या गेल्या अन् मध्यप्रदेशात, त्याचे नाव देण्यात आलेल्या रस्त्यावरील नावाचा फलक त्वेरेने काढला गेला. कुणावरही बिनदिक्कतपणे विश्वास ठेवणार्या समूहाचे अलौकिकत्व अन् वेगळेपण आहे ते हेच. ..
मुजोर सलमानचे मूर्ख समर्थककीस पाडत, कायद्याचा वाट्टेल तसा ‘वापर’ करून घेत स्वत:ची सुटका तर सलमान आताही करून घेईल. पैसा फेकला की कित्येक वकील त्यांचे कायद्याचे ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करायला सिद्ध होतील. त्यातूनच त्याचे नसलेले निर्दोषत्वही तांत्रिकदृष्ट्या मान्य होईल न्यायालयाला. ..
मंत्रालयातली उंदरं!परवा, एकनाथराव खडसे यांनी एक प्रकरण विधानसभेत उघडकीस आणले. खुद्द सत्ताधारी पक्षातले, खडसे यांच्यासारखे एक दमदार, अनुभवी, ज्येष्ठ नेतृत्व एखादे प्रकरण उघडकीस आणताहे म्हटल्यावर, त्याचे गांभीर्य दखलपात्र ठरणे ओघानेच आले. प्रकरण आहे, ..
यथा प्रजा तथा राजा...!एक काळ होता, विधानसभा किंवा लोेकसभेत आपल्याला न पटणारे विचारही ऐकून घेण्याची तयारी असायची. सभात्यागाला किंमत होती. सरकारविरोधात दिल्या जाणार्या घोषणांना महत्त्व होते. ..
पवारसाहेब, कशाला उगाच विदर्भाच्या आड येता?कधीकाळी यशवंतराव चव्हाणांनी विदर्भाचा लढा हा केवळ अभिजनांचा असल्याचे सांगत, त्यातील हवा काढून घेण्याचा कुटिल डाव खेळला होता. आज, स्वत:ला त्यांचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना या लढ्यातील मराठी माणसाच्या सहभागाचा अभाव कधी नव्हे एवढ्या प्रकर्षाने ..
चौफेर - छे! छे! अब्दुल्लाजी, भारत तुमच्याच बापाचा!‘भारत हा काय तुमच्या बापाचा आहे का?” असा सवाल छातीठोकपणे करणाऱ्या अब्दुल्लांना जाब कोण विचारू शकतो? आपल्या बापाचा समजून ज्यांनी काश्मिरात कधी इतर कुणाला हस्तक्षेप करू दिला नाही, तिथे कायम आपली मक्तेदारी असावी यासाठी प्रयत्न केलेत, आपल्या बापजाद्याची ..