Home

आखातात युद्धाचा भडका उडालेला असताना पंतप्रधान मोदींचा फ्रान्स राष्ट्राध्यक्षांशी संवाद! काय चर्चा झाली?

(PM Modi Emmanuel Macron Call) इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेले युद्ध आता आणखी गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता हे देश एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारत आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांशी संवाद साधत पश्चिम आशियातील परिस्थितीचा आढावा घेतला.(PM Modi Emmanuel Macron Call)..

कोण आहे मोनालिसाचा पती फरमान खान? अभिनेता म्हणूनही आहे ओळख

महाकुंभ मेळ्यादरम्यान अचानक चर्चेत आलेली मोनालिसा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अलीकडेच तिने केरळमधील एका मंदिरात अभिनेता आणि मॉडेल फरमान खान याच्यासोबत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांचा या नात्याला विरोध असल्याच्या चर्चा असल्यामुळे या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्नानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांनी केरळ पोलिस यांच्याशीही संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे...

‘द केरळ स्टोरी ३’? ‘…हा तर लव्ह जिहाद’, मोनालिसाने मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यानंतर दिग्दर्शकाने केली सनसनाटी टिका

महाकुंभ मेळ्यात माळा विकताना अचानक सोशल मीडियावर व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्याही चित्रपटामुळे किंवा सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे, तर तिच्या लग्नामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. मोनालिसाने आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. या बातम्या समोर आल्यानंतर तिला चित्रपटात लॉन्च करणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे...

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे नळबाजारातून शेकडो किलो गोमांस जप्त!

रमजान महिन्यातच मुंबईतील नळ बाजार परिसरात गोमांस आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे संशयित गोमांसाचा साठा जप्त करण्यात आला. सदर प्रकरणाची पोलिसांद्वारे चौकशी सुरु असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशी माहिती आहे की, ज्यावेळी गोरक्षक घटनास्थळी पोहोचले तेव्हा धर्मांध मुस्लिमांचा जमावाने त्यांना मारहाण केली...

विजय-रश्मिकाची लगीनघाई! उदयपूरमध्ये रंगणार विवाहसोहळा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) अखेर लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम देत स्वतःच मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. मात्र आता या दोघांनी आपल्या लग्नाला अधिकृत स्वरूप देत त्याला खास नाव दिलं आहे ते म्हणजे विरोश (VIROSH) विजय आणि रश्मिका यांच्या नावापासून हे छान नाव त्यांनी आपल्या नात्याला दिलं आहे...

रणवीर सिंग खंडणी प्रकरणात मोठा खुलासा, बिश्नोई गँगच्या हॅरीची चौकशी सुरु

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याला अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याप्रकरणी मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसेच बॉलिवूड आणि खंडणी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. दरम्यान, आता याच प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित हरिचंद्र उर्फ ‘हॅरी बॉक्सर’ याने रणवीरच्या मॅनेजरला व्हॉइस नोट पाठवत कोट्यवधींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रणवीर सिंगची सुरक्षा देखील वाढवण्यात आली असून मुंबई क्राइम ब्रँचनं आरोपीविरुद्ध लुकआउट सर्क्युलर (LOC) जारी केला आहे...

रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी आहे त्या अढळ निष्ठेचा आणि अजेय शौर्याचा. एक अशी गाथा, जी केवळ कथा नाही तर आहे ‘एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान’...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष : १९५२ ते २०२६मध्ये आलेले उत्तम चित्रपट, मालिका पाहिल्यात?

१९ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा मानला जातो. याच दिवशी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रप्रेम जागवणारा दिवस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, व्याख्याने आणि अभिवादन सोहळे आयोजित केले जातात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेची गाथा मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्..

जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे : सरसंघचालक

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत डॉ. मोहनजी भागवत यांनी बजावले मतदानाचे कर्तव्य..

West Bengal SIR : पश्चिम बंगालमध्ये ५८.२० लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने मसुदा यादी केली जाहीर

मुंबई : (West Bengal SIR) निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालची २०२६ ची प्रारूप मतदार यादी मंगळवारी जाहीर केली. या प्रक्रियेमुळे राज्यातील ५८.२० लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून, त्यामुळे मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) पूर्वी ७ कोटी ६६ लाख ३७ हजार ५२९ असलेली मतदारसंख्या आता ७ कोटी ०८ लाख १६ हजार ६३१ वर आली आहे...

Kumbh Mela Nashik 2027 : झाडाला मिठी मारता, तसं बकरीला का मिठी मारत नाही?, राणेंचा सवाल

मुंबई : (Kumbh Mela Nashik 2027)नाशिकमध्ये २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभेमळ्याच्या तयारीला वेग आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू-महंतांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरात तयार करण्यात येणाऱ्या साधूग्राममुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. साधुग्राम उभारणीसाठी तपोवन परिसरात ११५० एकरावरील १८०० झाडे तोडण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी ग्रीन मार्किंग सुरू करण्यात आलं आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या संवेदनशील मुद्द्याने तात्काळ ..

बहुपत्नीत्व पद्धतीला अखेरचा ब्रेक! आसाम सरकारचे मोठे पाऊल

आसाम सरकारने राज्यात बहुपत्नीत्वावर पूर्णतः बंदी घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. गुरुवारी आसाम विधानसभेत बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक (प्रोहिबिशन ऑफ पॉलिगॅमी बिल २०२५) मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या मंजुरीनंतर आसाम हे देशातील पहिले असे प्रमुख राज्य ठरले आहे, ज्याने बहुपत्नीत्वाला थेट दंडनीय गुन्हा घोषित केले आहे. सरकारचा दावा आहे की हा कायदा महिलांच्या विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ऐतिहासिक ठरेल...

Ladki Bahin Yojana : ‘देवाभाऊ’ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना शब्द

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांवेळी चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चर्चेत येताना दिसत आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार असल्याचे विरोधक सातत्याने बोलत आहेत. मात्र ही लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अद्यापही सुरू आहे. यावरूनच आता लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी लाडकी बहीण योजना बंद होऊ न देण्याचा शब्द दिला आहे...

BMC Election : काँग्रेसला युतीसाठी कधीही प्रस्ताव दिला नव्हता, वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा!

मुंबई : आगामी मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकीच्या तोंडावरच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यात चांगलाच शाब्दीक वाद रंगला आहे. मनसेच्या कार्यशैलीवर खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली होती. आता याच टीकेवर देशपांडे यांनी गायकवाडांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला देत टोला लगावलाय. (BMC Election)..

Bangladesh : बांगलादेशात हाय अलर्ट, शेख हसीना प्रकरणावर आज निर्णय; भारतानेही बॉर्डरवरील सुरक्षा वाढवली!

मुंबई : बांगलादेशमध्ये (Bangladesh) तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण देश हाय अलर्टवर आहे. भारतानेही भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षा अधिक कडक केली आहे. भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावरील आरोपांवर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आज (दि. १७ नोव्हेंबर) निकाल देणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे...

क्रिकेट सामन्यानंतरही रुमवर ऑफिसचं काम करतो..बहिणीने केला खुलासा!

भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता युएसए संघाचा एक भाग असलेल्या सौरभविषयी नवी माहिती समोर आली आहे...

जागतिक महिला दिनी सायन रुग्णालयात महिला करणार रक्तदान

जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते...

गोरेगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शेळीपालन कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३० पशुसखी उपस्थित होत्या...

२१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. ..

तिसऱ्या कसोटीत भारत सुस्थितीत; दुसऱ्या डावात ३२२ धावांची आघाडी

भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. तसेच, टीम इंडियाकडे ३२२ धावांची बहुमोल आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे...

येत्या रविवारी ठाण्यात दैवज्ञ समाजाचा कलाविष्कार सोहळा

ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...

ठाण्यात माघी गणेशोत्सवात भक्ती आणि संस्कृतीचा संगम

ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी बाप्पा विराजमान झाले.पेण येथील सुबक, देखणी सुमारे सहा फुटाची श्रीगणेशाची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे. ..

राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत मुंबईच्या आयुष फाळकेची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले...

कामगार कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्लू.सलग पाचव्यांदा विजयी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडळाची सरशी

महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध खेळामध्ये यश मिळविले आहे...

कामगार कबड्डी स्पर्धेत न्यु इंडिया इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, अमरहिंद सरशी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यांत पुरुष शहर विभागातील लढतीत न्यु इंडिया इन्शुरन्स वि.रिझर्व्ह बँक यांच्यात अटीतटीची सामना झाला. पहिल्या डावात न्यू इंडियाने १८ - ०९ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रिझर्व्ह बँकेने आक्रमक खेळ दाखवत न्यू इंडियाला नमवले २१-२८ गुणांसह नमवले. परंतु पहिल्या डावात घेतलेल्या ९ गुणांच्या आघाडीमुळे २ गुणांच्या फरकासह न्यु इंडिया विजयी झाली...

भारत विरुध्द इंग्लंड कसोटी सामना; इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. दुसरा कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असून आणखी २ दिवसांचा खेळ बाकी आहे. ..

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, शिवशक्तीची विजयी सलामी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी साखळी सामन्यांमध्ये बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, स्नेहविकास, शिवशक्ती या संघांनी विजयी सलामी दिली आहे. पुरुष शहर विभागात पी.डी.हिंदुजा वि. रुद्रा असोसिएट्स यांच्यात चुरशीची लढत झाली. ..

दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी; इंग्लंडच्या पहिला डावात २५३ धावा

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत फंलदाजीचा निर्णय घेत ३९६ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला. तसेच, इंग्लंडकडून गोलंदाज अँडरसन, बशीर आणि अहमद यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात फक्त २५३ धावाच केल्या यात सर्वाधिक जॅक क्राव्हलीने ७८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. ..

यशस्वी घोडदौड! दुहेरी शतक ठोकत मोडला गावस्कर-कांबळींचा रेकॉर्ड

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेत डावाला सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने द्विशतकी खेळी रचत विनोद कांबळी, सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे...

चिमुकल्या कारागिरांच्या कलाकृतीचा अविष्कार

कोपरीतील श्री माँ बाल निकेतन शाळेत आयोजित केलेल्या ३६ व्या तेजस आंतरशालेय वार्षिक प्रदर्शनात चिमुकल्या कारागिरांच्या कलाकृतीचा अविष्कार पहावयास मिळाला. या प्रदर्शनाचे उ‌द्घाटन शुक्रवारी श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर तथा चेअरमन व विश्वस श्री बालगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले...

भारत विरुध्द इंग्लंड कसोटी सामना; सलामीवीर जयस्वालची नाबाद १७९ धावांची झुंजार खेळी

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...

गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या हितचिंतकपदी सत्यवान नर यांची नियुक्ती

'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट', मुंबई चे संस्थापक सत्यवान अंबरनाथ नर यांची गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट जे. जे. हॉस्पिटल, मुंबई या संस्थेत संस्थेचे “ हितचिंतक " म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र धर्मशाळेचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांनी सत्यवान नर यांना दिले...

व्यंकटेश नागेश सामंत यांना 'केडीजीबी एक्सलन्स' पुरस्कार

कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा श्री रत्नाकर प्रभाकर तेंडोलकर ह्यांच्या समारंभ अध्यक्षतेखाली कुडाळदेशकर तथा सारस्वत समाज राज्यस्थरीय वधू वर मेळावा तथा गौरव सन्मान कार्यक्रम दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मातृमंदिर गोरेगाव पूर्व मुंबई येथे पार पडला. ..

महापारेषण मुख्य अभियंता कादरी यांनी नोकरी करत मिळविली ईपीएसमध्ये पदव्युत्तर पदवी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) चे मुख्य अभियंता (पारेषण) कादरी सय्यद नसीर यांनी इलेक्ट्रिकल पावर सिस्टम या विषयात पदव्युत्तर पदवी एम ई (ईपीएस) छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राप्त केली. ..

धक्कादायक! तेंडुलकरचा डीप फेक व्हीडिओ व्हायरल!, सचिन म्हणाला, "हे प्रकरण..."

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाला आहे. सचिनने यासंदर्भात "X"वर पोस्ट करत डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी ठोस भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे. ..

पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाले लक्षद्वीप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप हे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. भारतीय ट्रॅव्हल्स कंपन्यांनादेखील लक्षद्वीपबाबत विचारणा करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट देण्यासाठी पहिली पसंती दर्शवली आहे. तसेच, भारतीयांनी मालदीव येथे पर्यटनाला जाण्यासाठी काढलेली तिकीटेदेखील यादरम्यान रद्द केल्याचे पाहायला मिळाले होते. ..

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्नसह अर्जुन पुरस्कार दिग्गजांना प्रदान

क्रीडा क्षेत्रातील यंदाचे खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनात औपचारिक समारंभात प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. क्रिकेटपटू मोहम्मद शामी आणि अॅथलेट पारूल चौधरी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

अभ्युदय सहकारी बँकेकडून ठेवीधारकांना मार्गदर्शन

अभ्युदय सहकारी बँकेच्या विक्रोळी कन्नमावर नगर येथील शाखेतर्फे ठेवीधारकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनस विक्रोळीतील सर्व कॉ. ऑप. हौसिंग सोसायट्याना डिपॉसिट एकत्रिकरण करण्याकरिता व 'अभ्युदय ५०० आणि अभ्युदय २०० डिपॉझिट स्कीम'करिता मार्गदर्शन करण्यात आले...

पुण्यात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात!

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिनानिमित्त हर घर सावरकर समिती, विवेक व्यासपीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कार्यशाळेची सुरुवात सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन केली...

विषारी द्रव्यांपासून वाचविण्यासाठी शरीरशुध्दीचे ६ प्रभावी उपाय : पोषणतज्ञ शेरिल सॅलिस

सणासुदीच्या काळात अनियंत्रित आहार केंद्रस्थानी असतो आणि या करिता नर्चर हेल्थ सोल्युशन्स च्या संस्थापिका व सफोला न्युट्रिशन पार्टनर (सफोला पोषण भागिदार), नोंदणीकृत आहार तज्ञ शेरिल सॅलिस, प्रत्यक्षात करण्याजोगे आणि सहजपणे अनुसरण करता येणारे उपाय सुचवतात जे तुम्हाला सणानंतर विषारी द्रव्यांपासून शरीरशुध्दी करण्यात मदत करू शकतात. ..

महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व दिनदर्शिका-२०२४ चे थाटात प्रकाशन

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर व दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले...

एकविसाव्या शतकात पुस्तक महोत्सवसारखे उपक्रम महत्वाचे : मंत्री सुधीर मुनगंटीवार

एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली...

भाजप नेते अतुल शाहांकडून राम मंदिरावर आधारित गाण्याची निर्मिती

भाजप नगरसेवक अतुल शाह यांच्या पुढाकारातून राम मंदिराच्या उद्घाटनावर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याचे लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सदर गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे...

कर्तव्य - द एनजीओ मेला अंतर्गत सायक्लोथोन मोहिमेचे आयोजन

'कर्तव्य - द एनजीओ मेला' कार्यक्रमाअंतर्गत विविध एनजीओला समाज माध्यमांशी जोडण्याचा अथक प्रयत्न करत असतो. येत्या १० डिसेंबर रोजी ससमीरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च द्वारा हा नियोजित कार्यक्रम आखण्यात आला आहे. एनजीओंना आपल्या कामचाप्रसार करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी समाजातून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील असतो...

सिंधुदुर्गातील पदवीधर शिष्टमंडळ आ. निरंजन डावखरे यांच्या भेटीला

दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले...

अरुणाचल प्रदेशातील कर्करोग जनजागृती

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात नुकतेच काही संस्थांच्या सहयोगाने ‘देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान’ने कर्करोगमुक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सदर जागृती कार्यक्रमाचा तपशील सारांश रूपात देत आहोत. ..

'मधापर अथवा मिधनापुरच्या वीरांगना !

जामनगर व भूज या टापूत साधारणपणे सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान दरम्यान धुमश्चक्री चालू होती. सोळा डिसेंबर ला युद्ध बंदी { सीज् फायर } घोषित करण्यात आली होती. पण,या ऐन धुमश्चक्रीत मिधनापूरच्या जवळपास अडीचशे महिलांनी इतिहास रचला. महिला नव्हेत... तर अठरा - वीस वर्षांच्या त्या लग्न झालेल्या लेकुरवाळ्या मुलीच होत्या. ..

कवी - लेखकांमध्ये विश्व बदलण्याची ताकद!

सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे. माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी - लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात. असा आशावाद अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला...

आयपीएल २०२४ साठी ११६६ खेळाडूंची नोंदणी; दुबईत १९ डिसेंबरला लिलाव

आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता बीसीसीआयकडून ११६६ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे. याआधी प्रत्येक संघाकडून आपल्याला खेळाडूला रिटेंशन करण्यात आले आहे. तर काही खेळाडूंना संघांकडून रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर आता एकूण ११६६ खेळाडूं लिलावाकरिता सज्ज झाले आहेत...