"कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा थक्क करणारा ट्रेलर

    05-Mar-2024
Total Views | 290
रणदीप हुड्डा याचा बहुचर्चित स्वातंत्र्यवीर सावरकर हा आणखी एक चरित्रपट २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा थक्क करणारा ट्रेलर भेटीला आला आहे.
 
 

veer savarkar 
 
मुंबई : “आजपर्यंत कॉंग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?”, असा थेट प्रश्न विचारणाऱ्या वीर सावरकर (SwatantraVeerSavarkar) यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (SwatantraVeerSavarkar) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला असून केवळ ताही तासांतच या ट्रेलर प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चरित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची व्यक्तिरेखा साकारत असून एका त्याच्यातील कलेचा आणखी एक नवा पैलु प्रेक्षकांचा पाहण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे.
 
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर' (SwatantraVeerSavarkar) या चरित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावरकरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्याचा तो कठिण काळ दाखवण्यात आला आहे. सावरकरांचा उल्लेख करताना इंग्रज भारतातील सर्वात खतरनाक व्यक्ती म्हणत त्यांना संबोधत असून पुढे सावरकरांनी साथीदारां सोबत विदेशी मालाची होळी कशी केली हे देखील पाहता येत आहे. तसेच, परदेशात सावरकर-गांधींची झालेली भेट, परदेशात जाऊन सावरकरांनी भारतात पुरवलेली शस्त्र, जहाजातून मारलेली उडी, स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेले संबोधन आणि अखंड भारत ही विचारधारा देतानाचे निडर सावरकर देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
 
चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच सावरकरांबद्दल न माहित असणाऱ्या गोष्टी आणि त्यांचा आजवर इतिहास जो मोठ्या पडद्यावर उलगडला नाही तो प्रेक्षकांसमोर मांडण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि निर्माता रणदीप हुड्डा याने उचलले आहे. तसेच, या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडे वीर सावरकरांच्या पत्नीची यमुनाबाईंची भूमिका साकारत आहे. हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार स्वातंत्र्यवीर सावरकर हा चरित्रपट २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या स्वाधीन होणार आहे.
 
 
मराठीत हा चित्रपट अधिक सुंदर वाटला
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. यावर आपले मनोगत व्यक्त करताना रणदीप म्हणाला, “मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट ज्यावेळी मराठी भाषेत पाहिला त्यावेळी मला अधिक सुंदर वाटला. सध्या जरी हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होत असला तरी जगभरातील प्रत्येक भाषेत हा चित्रपट व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण देश विदेशात वीर सावरकरांचा इतिहास त्यांची कथा पोहोचली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे”, असे देखील रणदीप याने म्हटले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121