मुंबई : (Devendra Fadnavis) देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवार दि.२ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की," विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. (Devendra Fadnavis)
हेही वाचा : Budget Breaking : महिला, दिव्यांग, आरोग्य वाहतूक क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा
लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. (Devendra Fadnavis)
मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी ५००० कोटी प्रत्येकी ५ वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे." (Devendra Fadnavis)
एकूणच या अर्थ संकल्पातील विविध बाबींचा उल्लेख करताना देशाला विकसिततेकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. (Devendra Fadnavis)