मुंबई : ( Sabarimala Gold Theft ) शबरीमला मंदिरातील सोने चोरी प्रकरणात देवस्वोम बोर्डाचे माजी सदस्य केपी शंकर दास यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशात त्यांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पण्या काढून टाकण्याची शंकर दास यांची याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायमूर्ती दीपांकर म्हणाले की, तुम्ही लोकांनी तर देवालाही सोडले नाही.
शबरीमला मंदिरातील सोने चोरीच्या प्रकरणात, केरळ उच्च न्यायालयाने के.पी. शंकर दास आणि के. विजयकुमार हे या गुन्हेगारी कटातून सुटू शकत नाहीत असा निर्णय दिला होता. त्यानंतर शंकर दास यांनी उच्च न्यायालयाची टिप्पणी रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांचे युक्तिवाद स्वीकारले गेले नाहीत आणि अपील फेटाळण्यात आले.
हेही वाचा : पाकव्याप्त जम्मू - काश्मिर भारताचा भाग व्हावा
साम्यवाद्यांचा डाव
मंदिरातून सोने चोरीला गेल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय चौकशी सुरू केली. याप्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आली. हे पथक अनेक व्यक्तींची चौकशी करत आहे. एसआयटीने आतापर्यंत त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते एन. वासू आणि ए. पद्मकुमार यांना अटक केली आहे.