State Government : शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; राज्य सरकारचा निर्णय

03 Jan 2026 17:05:05
 
State Government
 
मुंबई : (State Government) शेतकऱ्यांनी घेतलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर घेतला आहे. (State Government)
 
१ जानेवारी २०२६ रोजी महसूल व वन विभागाने याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले. यामुळे कर्ज घेताना होणारा आर्थिक भार आता कमी होणार असून, प्रशासकीय प्रक्रियाही सोपी होणार आहे. या निर्णयानुसार, २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी लागणारे ' हक्कविलेख, निक्षेप, तारण गहाण, हमी पत्र, गहाणखत आणि कर्ज करारनामा यांसारख्या सर्व कायदेशीर कागदपत्रांवर आता कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून तात्काळ अंमलात आला आहे. (State Government)
 
हेही वाचा :  Ameet Satam : अमीत साटम यांच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटन संपन्न
 
शेतकऱ्यांच्या कर्ज खर्चात थेट कपात
 
यापूर्वी शेतीच्या पीक कर्जावर प्रत्येक १ लाख रुपयांच्या मागे ०.३ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्यानुसार दोन लाख रुपयांच्या कर्जासाठी सुमारे ६०० रुपयांचे मुद्रांक शुल्क शेतकऱ्यांना भरावे लागत होते. आता हे शुल्क पूर्णतः माफ करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या कर्ज खर्चात थेट कपात होणार आहे. तसेच राज्यभरात लागू होणारा हा निर्णय सर्व बँका, सहकारी संस्था आणि कर्जवाटप करणााऱ्या यंत्रणांना बंधनकारक राहणार आहे. पीक कर्ज घेताना लागणाऱ्या कागदपत्रांवरील आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. (State Government)
 
"कर्ज काढतानाही शेतकऱ्याला भुर्दुंड बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर या मुद्रांक माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलचे कायदे आणि नियम अधिकाधिक सोपे आणि लोकाभिमुख करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना आहे, त्यानुसार महसूलमंत्री म्हणून हा निर्णय घेतला."
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
 
 
Powered By Sangraha 9.0