_202505091400529528_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
नवी दिल्ली : सध्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणि काही न्यूज चॅनेल्सवर अफवा पसरविल्या जात आहेत. की देशभरातील एटीएम सेवा बंद केल्या जातील, भारताकडे पुरेसा इंधन साठा नाही इ.. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले आहे की देशातील बँकिंग, एटीएम सेवा आणि इंधन सेवा सुरळीत चालू राहतील.
सरकार आणि बँका आपापल्या सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने स्पष्ट सांगितले आहे की, एटीएम सेवा बंद होणार असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
इंडियनऑइलकडे देशभरात भरपूर इंधन साठा आहे आणि आमच्या पुरवठा लाइन्स सुरळीतपणे सुरू आहेत. घाबरून इंधन खरेदी करण्याची गरज नाही—इंधन आणि एलपीजी आमच्या सर्व आउटलेटवर सहज उपलब्ध आहे. शांत राहून आणि अनावश्यक गर्दी टाळून आम्हाला तुमची चांगली सेवा करण्यास मदत करा. असे आवाहन इंडियनऑइलने केले आहे.
नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद किंवा अनअधिकृत माध्यमांकडून पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. अशा बातम्यांमुळे जनतेमध्ये अनावश्यक भीती निर्माण होतो. कृपया फक्त अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घ्या, जसे की PIB, सरकारी संकेतस्थळे. अधिकृत माहिती पाहण्यासाठी भेट द्या: [https://pib.gov.in](https://pib.gov.in)