'विद्या भारती'च्या शाळेतही आता सीबीएसईचा अभ्यासक्रम

    07-Jan-2025
Total Views | 30

Vidya Bharti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vidya Bharti CBSE Study)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विद्या भारतीच्या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरच्या राजापार्कमध्ये असलेल्या 'आदर्श विद्या मंदिर' शाळेला यावर्षी मार्चमध्ये सीबीएसईकडून मान्यता मिळणार आहे. शाळेच्या वार्षिक उत्सवाबाबत माहिती देताना व्यवस्थापन समितीनेयाबाबत सविस्तर माहिती दिली.

हे वाचलंत का? : महाकुंभात भामट्यांचा सुळसुळाट; यूपी पोलिसांकडून भाविकांना सतर्कतेचा इशारा

शाळेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव संजीव भार्गव म्हणाले की, 'ते कॉन्व्हेंट संस्कृतीशी सहमत नाहीत, परंतु भाषेवर त्यांचा आक्षेप नाही. स्वतःला ओळखण्यात आणि सर्वसमावेशकतेने पुढे जाण्यात काहीही नुकसान नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा इतर देशांना भेट देतात तेव्हाही ते तेथील भाषांचा आदर करतात. त्यामुळे त्यांनी एखाद्या विशिष्ट भाषेचा अवलंब केला तरी ते विचारांपासून दूर जात आहेत, असे नाही. उच्च वर्ग बऱ्याचदा आपल्या मुलांना विद्या मंदिर शाळेत शिकविण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यांना जोडण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, जेणेकरून आदर्श विद्या मंदिर आपल्या गौरवशाली इतिहासाची पुनरावृत्ती करू शकेल.' पुढे त्यांनी असे स्पष्ट केले की, इंग्रजी माध्यम केवळ पर्याय म्हणून असेल. याशिवाय हिंदी माध्यमही सुरू राहणार आहे.

व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष राजीव सक्सेना यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २२ भाषांचा समावेश करण्यात आला असून प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची तरतूद त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. सीबीएसईनंतर आदर्श विद्या मंदिरातही हे नियम लागू होतील. आदर्श विद्या मंदिर भारतीय मूल्ये आणि आधुनिक शिक्षण देण्यावर विश्वास ठेवते.

वार्षिक सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
आदर्श विद्या मंदिराचा वार्षिक सोहळा बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी येथील प्रांत प्रचारक बाबूलाल यांचे उद्बोधन होईल. शाळेचे माजी विद्यार्थी भाजपचे राष्ट्रीय महामंत्री सुनील बन्सल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्याचवेळी मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड हे कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चरित्रावरील लघुनाटिकाही विद्यार्थी सादर करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर खेळात सहभागी होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंना रौप्य पदक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, तर राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब व बॉक्सिंगच्या प्रत्येकी ४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल गौरविण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121