गिरीष महाजन महाजनांचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाले, "देशमुखांनी मला सांगितलं की..."

    05-Sep-2024
Total Views |
 
 
Mahajan  & Deshmukh
जळगाव : मंत्री गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता गिरीष महाजनांनी अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
 
गिरीष महाजन म्हणाले की, "अनिल देशमुखांनी आणि त्यांच्या नेत्यांनी कटकारस्थान करून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला ही गोष्ट सत्य आहे. त्यावेळचे तत्कालिन पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे हे गुन्हा दाखल करत नव्हते. मी असा खोटा गुन्हा कसा दाखल करू? असं ते म्हणायचे. पुण्यात ३ वर्ष १२ दिवस आधी घटना घडली आणि त्याविरोधात ६०० किलोमीटर लांब असलेल्या जळगाव जिल्ह्यातील निंभोऱ्यात गुन्हा नोंदवा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही. मात्र, अनिल देशमुखांनी पोलिस अधिक्षकांवर खूप दडपण आणलं आणि त्यांच्याशी खालच्या भाषेत बोलले. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर मी अनिल देशमुखांना भेटलो. त्यांनीही मला सांगितलं की, मी हतबल आहे. माझ्यावर आमच्या वरिष्ठ नेत्यांचं दडपण आहे. ते मला म्हणाले की, माझ्यावर खूप मोठं दडपण आहे. याबाबतीत तुम्ही शरद पवार साहेबांना भेटा. तरच मी तुमची मदत करू शकेन," असा मोठा गौप्यस्फोट महाजनांनी केला आहे.
 
हे वाचलंत का? -  अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल
 
ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी अनिल देशमुखांनी मला शरद पवार आणि एकनाथ खडसेंचं नाव सांगितलं. खडसे वारंवार पवार साहेबांकडे जाऊन बसतात आणि माझ्यावर त्यांचं दडपण आहे, असं त्यांनी मला सांगितलं. अनिल देशमुखांनी मला सांगितलं की, मी हतबल आहे. माझ्यासमोर बसवून त्यांना हे विचारा," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121