अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल

देशमुखांची फडणवीसांवर आगपाखड; देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पेनड्राइव्ह देत सादर केले होते पुरावे

    05-Sep-2024
Total Views | 62

Anil deshmukh
 
 
मुंबई, दि.४ : प्रतिनिधी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याचा आरोपात त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असणारा एक पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करत गिरीश महाजन यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची पोलखोल केली होती.
 
दरम्यान, महाविकास आघाडीसरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमदार गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एस.पी. प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघांतील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. हा गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली.
 
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
 
अनिल देशमुखांच्या या ट्विटला भाजप नेत्या चित्र वाघ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, "१०० कोटींची वसुली मनसुख हिरेनची हत्या, लादेन उर्फ वाझे, हेही तेव्हा तुम्ही तथ्यहिनच म्हणाला होतात ना? राज्यात गुंतवणूक येऊ नये म्हणून उद्योगपतींच्या घरांसमोर स्फोटके पेरण्याचे काम कोण करीत होते? हे विकृत आणि घाणेरडे राजकारण कोण करीत होते? थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी गद्दारी कोण करीत होते? पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे, हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे. निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या, यंदा जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही…!," असा इशाराच वाघ यांनी अनिल देशमुखांना दिला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121