भारतीय मिडियाला परकीय षड्यंत्रांच्या कथनातून बाहेर पडावे लागेल : उमेश उपाध्याय

24 May 2024 17:42:24

Umesh Upadhyay
(Umesh Upadhyay on Bharatiya Media)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 
"आज वृत्तपत्रांमध्ये नकारात्मकता दिसून येते. त्यात नारदजींचा लोककल्याणाचा विचार दिसत नाही. भारतीय मीडिया सध्या पाश्चिमात्य देशांवर आधारित आहे. देशाच्या संस्कृतीवर आघात करणारी माध्यमे नाकारण्याची खरी गरज आहे. भारतीय प्रसारमाध्यमांना परदेशी माध्यमांनी चालवलेल्या कथनातून बाहेर पडावे लागेल.", असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय यांनी केले.

देवर्षी नारद जयंतीनिमित्त गुरुवार, दि. २३ मे रोजी सायंकाळी लखनौ विद्यापीठाच्या एपी सेन सभागृहात 'देवर्षी नारदजींची वैदिक धोरणे आणि वर्तमान भारतीय पत्रकारिता' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळा कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व उत्तर प्रदेश क्षेत्र प्रचार प्रमुख सुभाषजी आणि चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार उमेश उपाध्याय उपस्थित होते.

हे वाचलंत का? : मतदान करताना राष्ट्राचे व्यापक ध्येय विसरता कामा नये! : राम माधव

पत्रकारिता विषयावर बोलताना उमेश उपाध्याय म्हणाले, " पूर्वीची पत्रकारिता हे एक मिशन होते, आजच्या पत्रकारितेत संघर्ष आहे. देवर्षी नारदाजींची संवादशैली आजच्या संवादशैलीपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारितेत समन्वय आणि समतोल राखावा लागेल. आज जवळजवळ फक्त नकारात्मक बातम्या मुख्य बातम्या बनताना दिसतात. जगातही लीड न्यूज या मूळ संकल्पनेत नकारात्मकता आहे. भारतीय माध्यमांनी या कथनातून बाहेर पडण्याची गरज आहे."

सुभाष जी यावेळी म्हणाले, 'पत्रकारितेत सुंदरता आणि दिव्यता असली पाहिजे. सुंदरता आणता येते, पण दिव्यत्वासाठी सत्याचा शोध घेऊन परिपूर्ण व्हावे लागते. देवर्षी नारदांनी हा धडा दिला आहे. पौराणिक कथांचा अभ्यास केल्यावर कळते की त्यांनी वाल्मिकी ऋषींशी चर्चा केली तेव्हा रामायण रचले गेले. आपल्या वीणाच्या सुरात त्यांनी समतोल आणि समन्वयाचा संदेश दिला आहे, जो पत्रकारितेच्या सध्याच्या परिस्थितीत स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे."

हे वाचलंत का? : बाबरी ढाचा कोसळताना केलेला 'तो' संकल्प अखेर पूर्ण

पुढे ते म्हणाले, "समाजात घडणाऱ्या प्रत्येक बदलाविषयी जाणून घेण्याची नारदजींना उत्सुकता होती. हीच उत्सुकता आणि कुतूहल त्यांना पत्रकार बनवते. पत्रकाराच्या मनात कुतूहल असणं खूप गरजेचं आहे. त्याला सतत प्रश्न कसे विचारायचे हे माहित असले पाहिजे. ज्याला जाणून घ्यायचे आहे, त्याला सर्व काही कळते. नारदजी समाजाच्या कल्याणासाठी प्रश्न विचारायचे. ते आदर्श, धर्म आणि सत्य शोधणारे जिज्ञासू लोक आहेत. देवर्षी नारद या प्रकारात सर्वात योग्य आहेत. नारदजी हे एक महर्षी आहेत जे लोकांमध्ये सत्याचे आचरण स्वीकारतात, प्रामाणिकपणे संदेश देतात आणि सत्याचा शोध घेतात."


Powered By Sangraha 9.0