"मत दिलं नाही तर बोटं कापू!", तृणमुलच्या गुंडांची उघड धमकी

12 Apr 2024 16:17:53

jhfeyfguyf

कोलकाता : पश्चिम बंगालच्या संदेशखाली मधील प्रकरण ताजे असतानाच. तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांवर पुन्हा एकदा स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने आरोप केला आहे. बुधवारी १० एप्रिलला रात्री टीएमसी कार्यकर्त्यांनी घर जाळल्याचा आरोप भाजप कार्यकर्ता सुब्रता मंडल यांनी आरोप केला आहे. टीएमसी कार्यकर्त्यांनी महीलांना साड्या वाटुन मतदानासाठी आमिष दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
पश्चिम बंगालमधील खुलना गावातील ही घटना आहे. सुब्रता मंडल यांनी केलेल्या अरोपानुसार टीएमसी गुंडांनी बुधवारी रात्री त्यांच्या घराला आग लावली. या मध्ये त्यांचे घर पुर्णपणे जळुन खाक झाले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील सर्व वस्तु जळुन खाक झाल्या.

हे वाचलत का ?- तुमचे राहूल गांधी एकदाही मातोश्रीवर का आले नाहीत?
 
या घटनेत आपला हात नसल्याचं तृणमुल काँग्रेसने म्हटलं आहे. पोलिस तपास करत आहेत त्यांच्या तपासात सत्य समोर येईल अस स्फष्टीकरण तृणमुलच्या नेत्यांनी दिलं आहे. परंतु सुब्रत मंडल यांच्या म्हणण्यानुसार ते भाजपचे कार्यकर्ते असल्याने त्यांना तृणमुल सरकारने सर्व सुविधांपासुन जाणुन बुजुन वंचित ठेवले गेले आहे. त्याचबरोबर तृणमुल काँग्रेसचे सदस्यत्व नाकारल्याने त्यांच्या गुंडांनी घर जाळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
संदेशखाली मधील महीलांवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पश्चिम बंगाल मधुन रोज नविन हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. काही मिडीया रिपोर्टनुसार तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते मतदानासाठी महीलांना साड्यांचे वाटप करत असल्याचे समोर आले आहे. महीलांनी तृणमुल काँग्रेसला मतदान न केल्यास त्यांचे परीणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात असल्याचीही माहीती आहे. विशेष म्हणजे या साड्या टीमसी ने खरेदी केलेल्या नसुन पश्चिम बंगालच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाने खरेदी केल्या आहेत असे वृत्त आहे.

हे वाचलत का ?- मतदान विरोधात कराल तर नंतर बघून घेऊ! मग कर्माला दोष देऊ नका; तृणमुल आमदाराची धमकी
 
रिपब्लिक बांग्ला या वृत्तवाहीनीशी बोवलताना संदेशखाली येथील महीलांनी सांगितले की टीएमसीचे कार्यकर्ते रात्रीच्या अंधारात साड्यांचे वाटप करतात आणि त्यांना टीएमसी निवडणूक चिन्हावर मतदान करण्यास सांगतात. त्यांनी टीएमसीला मतदान केले नाही तर त्यांची बोटे कापली जातील आणि त्यांना मारलं जाईल अशा प्रकारच्या धमक्या तृणमुल काँग्रेसच्या कार्यकरत्यांनी दिल्या असल्याचही महीलांनी म्हटलं आहे.
 
महिलांचा आरोप आहे की त्यांच्याकडे येणारे लोक हे गुंड शेख शाहजहानचे लोक आहेत आणि त्यांना आता टीएमसीच्या या नेत्याची भीती वाटत आहे. शहाजहानविरुद्ध सीबीआयचा योग्य तपास झाल्यावरच ते पूर्ण आत्मविश्वासाने मतदान करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0