"ठाकरे आणि पवारांना राऊतांचे ओझे!"

06 Mar 2024 12:58:30

Thackeray, Raut &  Sharad Pawar


मुंबई :
संजय राऊतांचे ओझे उद्धव ठाकरे आणि शरद पवार किती काळ उचलतात, हे बघावं लागेल असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांचे ओझे भाजप उचलतो असं संजय राऊत म्हणाले होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा काय फायदा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर आता नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
नितेश राणे म्हणाले की, "कलम ३७० हटवल्यानंतर काय फायदा झाला हे तुम्हाला भांडूपमध्ये बसून कळणार नाही. कधीतरी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरला जा आणि तिथे जो तिरंगा फडकवला जातो त्याकडे बघा. अजित पवार, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांचे ओझे आम्ही उचलतो असं तुम्ही सांगता. पण संजय राऊतांचे ओझे उद्धव ठाकरे आणि शरद पवार किती काळ उचलतात हे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे संजय राऊत तुम्ही तुमच्या उरलेल्या पक्षाचा आणि तुमच्या कुटुंबावर झालेल्या ओझ्याचा आधी विचार करा आणि मगच बोला."

हे वाचलंत का? - लोकसभेनंतर राष्ट्रवादी पुन्हा पवारांकडे?, रोहित पवारांचे दिवास्वप्न...
 
"अमित शाह महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी येतात. तुमच्यासारखं महाराष्ट्राशी गद्दारी आणि बदनामी करण्यासाठी येत नाही. संजय राजाराम राऊत आणि त्यांचे मालक महाराष्ट्राला डुबवण्याचे काम करत आहेत. संजय राऊतांनी हातात दिवा घेऊन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला काश्मीरमध्ये जावं आणि तिथल्या चौकाचौकात फडकणाऱ्या तिरंग्याकडे बघावं. हा तिरंगा मोदी सरकार आणि अमित शाहांमुळेत फडकतो आहे," असे ते म्हणाले.
 
संजय राऊतांनी कोल्हापूरचा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असल्याचे म्हटले होते. यावर नितेश राणे म्हणाले की, "ज्यांनी आयुष्यात साधी सरपंच पदाचीही निवडणुकही लढवली नाही आणि जे राज्यसभेत काठावर पास झाले आहेत ते मतदारांची भाषा करत आहेत. कधीतरी निवडणुक लढवा आणि मग लोकसभेच्या मतदारांबद्दल भाष्य करा."

हे वाचलंत का? - "१९ वेळा लाँन्च होऊनही 'राहूलयान' पोहोचलंच नाही!"
 
आदित्य आणि रश्मी ठाकरेंचं लोकेशन जाहीर करा!
 
आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचा दावा मंत्री दीपक केसरकरांनी केला होता. यावर राणे म्हणाले की, "दिशा सालियान प्रकरणामुळे ठाकरे कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दिशा सालियान प्रकरणात जे उद्धव ठाकरे माझ्या मुलाला वाचवा असं म्हणण्यासाठी नारायण राणेंना फोन करु शकतात ते मोदीजींनाही भेटूच शकतात. याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचे सगळे लोकेशन जाहीर करावेत," असे आवाहनही राणेंनी केलं आहे.

Powered By Sangraha 9.0